ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यानंतर ते सांगलीकडे रवाना झाले आहेत. चिपळूण, कोल्हापूर येथील पूरपरिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते आज सांगली दौऱ्यावर आले आहेत.
महापुरामुळे सांगली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे संसार उद्धस्त झाले आहेत. तर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर पूरपरिस्थितीची मुख्यमंत्री आज पाहणी करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या या दौऱ्याकडे पूरगस्तांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
पावणे अकरा वाजल्यापासून ते अंकलखोप, भिलवडी, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज व सांगली येथे पूर परिस्थितीची पाहणी तसेच पूरग्रस्तांच्या भेटीगाठी घेणार आहेत. तर, दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पूर परिस्थिती बाबत आढावा बैठक घेतील. या आढावा बैठकीत ते काही मोठ्या घोषणा किंवा पूरग्रस्तांना दिलासा देतात का ? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
लाईव्ह अपडेट
-मुख्यमंत्री भिलवडीत दाखल
-पूरग्रस्त बांधवांशी साधत आहेत संवाद
-कोरोनाचे संकट अजूनही, गर्दी टाळा
-कायम स्वरुपी तोडगा काढावा लागेल
-पाण्याची पातळी मोजत बसण्यासाठी आपले आयुष्य नाही
-मला खोटे बोलता येत नाही, प्रामाणिक प्रयत्न करणार : मुख्यमंत्री
-केवळ काही मिनिटातच भिलवडीतून मुख्यमंत्री पडले बाहेर
-अनेक पूरग्रस्त बांधव संतप्त, अनेकांना द्यायची होती निवेदने
भिलवडीनंतर पुढील पाहणीसाठी मुख्यमंत्री रवाना
मुख्यमंत्री अंकलखोपमध्ये दाखल