प्रतिनिधी/ रत्नागिरी
परतीच्या पावसाचा आणखी 4 दिवस अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूरनंतर मराठवाडा भागात दौऱयावर आहेत. येत्या आठवडय़ात ते कोकण दौऱयावर येण्याची शक्यता आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. ते लक्षात ठेवून अधिकाऱयांनी जिह्यातील बाधितांची पूर्ण माहिती तयार ठेवावी, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत, अशा सूचना उदय सामंत यांनी अधिकाऱयांना केल्या आहेत.