ऑनलाईन टीम / मुंबई
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दि. 8 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेणार आहेत. यावेळी तौक्ते चक्रीवादळ, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यांच्यासह राज्यातील इतर प्रश्नांवर यावेळी चर्चा होणार असल्याचे राज्याचे गृह राज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केल आहे.
महाराष्ट्रात अऩेक प्रश्नांवरुन वेगवेगळे मोर्चे निघत असून याकरिता जनतेचे लक्ष राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या भूमिकेकडे लागले आहे. विशेषत: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जनतेत संताप पसरला असून, तशा प्रतिक्रीया ही समोर येत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री कार्यालयास भेटीसाठी विनंती केली होती. ती मान्य केली असून यामूळे दि. 8 जून रोजीची पंतप्रधान मोदींची भेट निश्चित झाली आहे. उद्या होणाऱ्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या चर्चेमुळे मराठा आरक्षणावर मार्ग निघण्याची दाट शक्यता असल्याने त्याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे. त्याच बरोबर मागासवर्ग आयोग, घटनादूरुस्ती या प्रश्नांवर ही निर्णायक भूमिका घेतली जाऊ शकते. त्यामूळे उद्याच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लागून आहे.