ऑनलाईन टीम / सातारा :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीहून साताऱ्याला रवाना झाले आहेत. काहीच वेळात ते कोयनानगरला पोहचतील. पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव येथील आपदग्रस्त परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. तसेच कोयनानगरमधील महापुरानं बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन मुख्यमंत्री त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.