ऑनलाईन टीम / सातारा :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी मातोश्रीहून साताऱ्याला पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रवाना झाले होते. मात्र, ढगाळ वातावरणामध्ये दृष्यमानता कमी झाल्याने मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर अर्ध्यावरूनच पुण्याला परतले. दरम्यान, सातारचा दौरा रद्द करून मुख्यमंत्री आता पुण्यातून मुंबईकडे रवाना झाले.
पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव येथील आपदग्रस्त भागाला भेट देऊन मुख्यमंत्री ठाकरे तेथील परिस्थितीचा आढावा घेणार होते. तसेच कोयनानगरमध्ये महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन नागरिकांशी संवाद साधणार होते.