ऑनलाइन टीम / नागपूर :
महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून शिवसेनेने भगव्याशी तडजोड केली. शिवसेनेने त्यांच्या विचारधारेशी तडजोड केली. केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेसाठी एकत्र आले आहेत. अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
नागपूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ते प्रचारसभा घेत होते. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, पहिल्यांदा शिवसेना फक्त भगवा फडकवण्याची भाषा करायची. शिवसेना केवळ भगवा रंग असल्याचे भासवते, पण प्रत्यक्षात ती आता काँग्रेसच्या रंगात रंगली आहे. अशी टीका ही त्यांनी यावेळी केली.