मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी व कर्तव्य याचे घडवाले दर्शन नारायण झांटय़ महाविद्यालयातील निवारागृहाला मुख्यमंत्र्यांची भेट
डिचोली / प्रतिनिधी
सध्या राज्यभर चालू असलेल्या लॉकडाउन व कोरोना व्हायरसच्या बाबतीत दरदिवशी प्रत्येक क्षणाची माहिती घेऊन राज्यातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव झटणाऱया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्या नेतृत्वस्थानी राहून आपली जबाबदारी सर्वच पातळीवर कशा पध्दतीने पाळावी याचे उत्कृष्ट उदाहरण काल रविवारी (दि. 12 एप्रिल) डिचोलीत दाखवून दिले. नारायण झांटय़े वाणिज्य महाविद्यालयात साकारण्यात आलेल्या निवारागृहांला दुपारी अचानक भेट देताना या लोकांशी संपर्क साधला तसेच या लोकांना जेवणही वाढले.
वाठादेव सर्वण येथील नारायण झांटय़े वाणिज्य महाविद्यालयात साकारयात आलेल्या निवारागृहात डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांच्या पुढाकाराने लॉकडाउन काळात बेघन बनून अन्न पाण्यासाठी वंचित राहिलेल्या 74 बिगरगोमंतकीय लोकांना निवारा देण्यात आला आहे. त्यांना या ठिकाणी नियमित दोन वेळचे जेवण पुरविले जाते. तसेच त्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली आहे. मामलेदार पंडित यांनी स्वखर्चाने या लोकांना चप्पले, लहान मुलांना खेळणी वितरीत केली होती. तसेच काही लोकांकडून देण्यात आलेले जुने कपडेही या लोकांना देण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांची अचानक भेट !
गेले अनेक दिवस या लॉकडाउन व कोरोना व्हायरससंदर्भात विविध आव्हाने यशस्वीपणे पेलत असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल रवि. दि. 12 एप्रिल रोजी दुपारी अचानक नारायण झांटय़े महाविद्यालयातील निवारागृहाला भेट दिली व येथे निवारा घेत असलेल्या लोकांची पाहणी केली. त्यांची चौकशी करताना त्यांना सर्व सोयी व जेवण वेळेवर मिळत आहेत की नाही ? असा प्रश्न केला असता या लोकांनी होकारार्थी उत्तर देताना राज्य सरकार, मुख्यमंत्री व डिचोलीचे मामलेदार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या निवारागृहात आम्हला सर्व प्रकारच्या आवश्यक सोयी मिळत असल्याचे यावेळी लोकांनी सांगितले.
यावेळी मामलेदार प्रवीणजय पंडित, तलाठी अजित गावकर, विजय कवठणकर, सिदेश आमोणकर, साखळीतील युवकवर्गाची व इतरांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या हातानी वाढले जेवण.
दुपारीच या निवारागृहात भेटीसाठी आलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या लोकांशी वार्तालाप केल्यानंतर त्यांच्या जेवणाची वेळ झाली होती. काल रविवारी साखळीतील युवकांतर्फे या लोकांना खास जेवणाची सोय करण्यात आली होती. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्वतः आपल्या हातांनी जेवण वाढले. आणि राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने या राज्यातील लहानातल्या लहान माणसांबद्दल आपल्याला असलेली तळमळ दाखवून दिली. या अनपेक्षित क्षणांमुळे बेघर म्हणून राहणारे लोकही भारावून गेले होते.
या बिकट परिस्थितीत राज्यातील कोणीही गरीब उपाशी राहू नये यासाठी प्रयत्नरत
आज देशार आणि भारतावर या कोरोना व्हायरसमुळे आलेल्या भयानक परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्हला लॉकडाउन लागू करणे भाग पाडले आहे. या लॉकडाउन काळात राज्यात कोणीही उपाशी राहू नये यासाठी सरकारने व आपण स्वतः काळजी घेतली आहे. त्यानुसार सर्वत्र नेमलेल्या अधिकारी वर्गाकडून योग्य काम होत आहे. या लॉकडाउनचा काळ जरी वाढला तरीही त्याचा सामना करताना राज्यातील प्रत्येक नागरिकाची अंतोदय तत्वावर काळजी घेण्यासाठी आपण प्रयत्नरत राहणार, असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले