आम आदमी पक्षाचे उमेदवार अमित पालेकर यांचे आव्हान
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील भाजपा सरकारने पाण्याची आणि विजेची हजारो रुपयांची भरमसाठ बिले जारी करून सामान्य ग्राहकांना जेरीस आणले आहे. याचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीत दिसून येईल. मोफ्ढत पाणी देण्याची घोषणा देणाऱया मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक चर्चेसाठी खुल्या मैदानात यावे, असे आव्हान आम आदमी पक्षाचे उमेदवार ऍड. अमित पालेकर यांनी पणजीत पत्रकार परिषदेत दिले.
आम आदमी पक्षाचे सर्वोसर्वा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी क् दिल्लीत 300 युनिट वीज मोफ्ढत देण्याची घोषणा केली, तेंव्हा लगेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोफ्ढत पाणी देण्याची घोषणा केली.
मुख्यमंत्र्यांची ही खोटी घोषणा हवेतच विरगळून गेली. घोषणेनंतर पुढील महिन्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाने ग्राहकांना हजारो रुपयांची बिले पाठविली. ही बिले नजरचुकीने व पाणी विभागाच्या अधिकाऱयांच्या गैर समजुतीमुळे आली आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगून ती बिले न भरण्याचे आवाहन जनतेला केले होते. मात्र ते हवेत विरून गेले असल्याचे पालेकर म्हणाले.
यावेळी पालेकर यांनी पत्रकारांसमोर पाण्याची दोन बिले सादर केली. एक विठ्ठलापूर साखळी येथील नळाच्या पाण्याचे बिल 5,950 रूपये आले होते. मुख्यमंत्र्याच्या घोषणेमुळे त्यानी ते बिल भरले नाही. मात्र आता दि. 21 जानेवारी 2022 रोजी नवीन बिल 2775 व मागील महिन्याचे 5950 रूपयांची थकबाकी व व्याज रुपये 28 मिळून त्याला 8753 रुपयांचे बिल आले.
तसेच चिंबल येथील बेर्था नामक महिलेला विजेचे बिल 1,13,036 रुपये आले. सदर महिला तक्रार करायला वीज कार्यालयात गेली असता आधी बिल भरा व नंतर तक्रारीची दखल घेतली जाईल. खात्याची चुक असल्यास पैसे परत केले जातील, असे तिला सांगण्यात आले. वीज बिल न भरल्याने सध्या त्या म†िहलेला वीज कनेक्शन तोडण्याची धमकी वीज खाते देत असल्याचे अमित पालेकर यांनी सांगितले.
राज्यातील सामान्य जनतेला आलेल्या पाणी आणि वीजेच्या भरमसाठ बिलांचा परिणाम दि. 14 फ्sढबुवारी रोजी होणाऱया मतदान पेटीतून जरूर दिसून येईल, असे पालेकर यांनी सांगितले.
लोक मुख्यमंत्र्यांना घाबरतात ?
चिंबल येथील वीज बिल धारकाचे नाव अमित पालेकर यांनी जाहीर केले. पण साखळीतील पाण्याच्या बिल धारकाचे नाव जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. सदर घटना मुख्यमंत्र्याच्याच मतदारसंघातील असून त्या ग्राहकाला नाहक त्रास नको म्हणून नाव जाहीर करीत नाही, असे पालेकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांना जनता एवढी घाबरते का ? असे पत्रकारांनी विचारले असता पालेकर म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी सरकारी यंत्रणेचा वापर करून आपला दरारा निर्माण केला आहे. आपला पिच्छा पुरविण्यासाठी पाठलाग करणारी सरकारी यंत्रणा लावली असल्याचे पालेकर यांनी सांगितले.
सांताप्रुज व कुडचडे येथील धार्मिक कार्यक्रम, जत्रोत्सव व नाटके बंद करायला लावली. मुख्यमंत्री निवडणूक आयोगाचाही वापर करत आहेत, असा आरोप पालेकर यांनी केला.
‘आप’ चांगले सरकार देईलः पालेकर
आम आदमी पक्षाने जनतेला दिलेली वचने तंतोतंत पाळली जाणार आहेत. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत ते करून दाखविले आहे. गोव्यातही आपचे सरकार चांगले सुशासन देऊ शकेल, असा विश्वास अमित पालेकर यांनी व्यक्त केला.