मुंबई \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली, पवार साहेबांना बारमालकांची काळजी.. सामान्य माणसा तुच तुझा वाली, अशा शब्दात उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे.
एकामागुन एक ट्वीट करत केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन पुन्हा वाढला. मुख्यमंत्री म्हणालेच होते, माझे कुटुंब, माझी जबाबदारी… सामान्यमाणसा, नोकरदारा, बलुतेदारा, नोकरदारा, कष्टकरी मजुरा, तूचआहेस तुझा रक्षणकर्ता. मायबाप राज्य सरकारने तुला नव्या लाटेत वाऱ्यावर सोडले आहे. तुझा EMI, तुझ घरखर्च, तुझ लाईटबिल तुच पहा. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे, पवार साहेबांना बारमालकांची काळजी, तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे. वसुली सरकारवर विसंबून राहण्यात अर्थ नाही. वसुली सरकारमध्ये पोलिसात वाजे तर लस द्यायला फरहान अख्तर लाडका आहे, सामान्य माणसा तुच तुझा वाली”, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्यात आता ब्रेक द चैनचे निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असतील, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. त्याबद्दलचं परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आलं आहे.