भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उद्धव ठाकरेंना टोला
प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवसेनेच्या दसरा महोत्सवातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱयांसह राज्यातील विविध प्रश्नांवर बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र या विषयावर एकही शब्द न काढता त्यांनी केवळ केंद्र सरकारवर तोंडसुख घेण्यात समाधान मानले. एकीकडे मदतीसाठी राज्यातील शेतकरी आक्रोश करत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे कानाडोळा करत दसऱयालाच शिमगा आहे असे समजत केंद्राच्या नावाने शिमगा केला, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणात कशाचाही कशाला मेळ लागत नाही, अशी टिकाही पाटील यांनी केली.
शिवसेनेच्या दसरा महोत्सवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य लढÎात संघ कुठे होता, असा प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारवर टिका केली. मुख्यमंत्र्याच्या भाषणाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमधून उत्तर दिले. याप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांना इतिहास माहीत आहे का
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दसऱया मेळाव्यात हिंदुत्वाच्याबाबतीत आणि मोहन भागवत यांच्या भाषणाबद्दल बोलले, याबाबत आश्चर्य वाटत आहे. तसेच स्वातंत्र्य लढÎात संघ कुठे होता, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मात्र असे विचारत असताना मुख्यमंत्र्यांना इतिहास माहित असावा लागतो, असा टोला लगावत स्वातंत्र्य लढÎात तुम्ही कोठे होत, असा प्रतिसवाल केला. तसेच तत्कालीन वेळी संघ स्थगित ठेवून सगळे स्वयंसेवक स्वातंत्र्य लढÎात उतरले होते, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असे पाटील म्हणाले.
सत्तेसाठी त्यांना हिंदुत्व सोडावं लागल
सत्तेसाठी लाचार होवून मुख्यमंत्र्यांना हिंदूत्व सोडाव लागलं. बाबरी मशिद पाडताना एक तरी शिवसैनिक होता का. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते कोणी जबाबदारी घेत नसेल तर मी घेतो, मग बाबरी मशिद शिवसेनेने पाडली असा त्याच्या अर्थ घ्यायचा का, अस प्रश्न पाटील यांनी केला. मोदी सरकारवर टिका करण्याऐवजी राज्य सरकारने काहीही केलेले नाही. मात्र कोरोना काळात केंद्र सरकारने सर्वात जास्त मदत महाराष्ट्राला केल्याचा विसर मुख्यमंत्र्यांना पडला आहे. असेही ते म्हणाले.
पॅकेजबाबत स्पष्टता द्या
राज्यातील शेतकऱयांसाठी दहा हजारा कोटींच्या पॅकेजची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र या दहा हजार कोटींमध्ये काय दिले हे स्पष्ट केले नाही. रस्ते आणि धरण दुरुस्तीसाठी पॅकेज दिले, शेतकऱयांना काय दिले. मुख्यमंत्र्यांनी दहा हजार कोटींच्या पॅकेजची फोड करावी, त्या पॅकेजमध्ये काय काय आहे याची स्पष्टता द्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले.