बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. दरम्यान राज्यात रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिल्यास गरज पडल्यास लॉकडाऊनबाबत राज्य सरकार निर्णय घेऊ शकते, असे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी म्हंटले आहे. पण सध्या राज्यात लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा कोणताच विचार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे. राज्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे.
दरम्यान राज्यात वाढती कोरोनसंख्या लक्षत घेता मुख्यमंत्र्यांनी १८ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लावण्याचा प्रश्न नाही, असे म्हंटले आहे. राज्य तांत्रिक सल्लागार समितीने म्हटले आहे की २ मे पर्यंत राज्यात सकारात्मक घटनांमध्ये वाढ होणार असल्याचे म्हंटल आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लोकांनी कोविड नियमांचे पालन केले पाहिजे, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हंटले आहे.