ऑनलाईन टीम / नवी मुंबई
पुण्यातील तुळशीबागेतील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी संपुर्ण राज्यातून नागरिक येत असतात. भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करतात. आणि पारंपारिक प्रथेप्रमाणे अनंत चतुर्थीला गणेशाचे विसर्जन करतात. याच पार्श्वभूमीवर पुण्यात आज लाडक्या बाप्पाला आज निरोप दिला जात आहे. पुण्यातील तुळशीबागेतील मानाचा चौथा गणपतीचे विसर्जन मिरवणुक जात असताना ढोल – ताशा वादन सुरु होते. याचवेळी पोलीसांनी वादन करु नये यासाठी त्यांच्याजवळील साहित्य काढून घेतलं होतं. या घटनेवरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.ऑ
यावर बोलताना भातखळकर यांनी थेट उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत मुख्यमंत्र्यांनी राज्यात शरिया राजवट जारी करणे तेवढे बाकी आहे. पुणे पोलिसांनी मानाच्या गणपतीचे ढोल – ताशे जप्त केले आहेत. खंडणी सरकारच्या दडपशाही धोरणाचा हिशेब केल्या शिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. असे ट्वीट ही त्यांनी केले असुन राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. यावर महाविकास आघाडी नेते काय प्रतिक्रीया देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.