प्रतिनिधी/ बेळगाव
परप्रांतीय कामगारांना राज्य सरकारच्या खर्चातूनच त्यांना त्यांच्या राज्यामध्ये पाठवून द्या, याचबरोबर ज्या भागामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले नाहीत, त्या भागातील व्यवहार सुरळीत सुरू ठेवा, अशी सूचना मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी पालकमंत्री जगदीश शेट्टर, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यासह जिल्हय़ातील इतर नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना केली आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी पाठविणे गरजेचे आहे. मात्र, पाठविताना त्यांची योग्य प्रकारे आरोग्य तपासणी करून त्यांना पाठवून द्या, असे सांगितले. आपल्या राज्यात येणाऱया कामगारांचीही काळजी घ्या. ते आल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करा. महाराष्ट्रामध्येही मोठय़ा प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून येणाऱयांवर मात्र काहीसे निर्बंध घाला, असेही मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सांगितले आहे.
गोव्यामधून मात्र कोणीही येत असेल तर त्यांना तातडीने परवानगी द्या. ते आल्यानंतर त्यांची क्वारंटाईनमध्ये व्यवस्था करण्याबाबतही यावेळी सूचना करण्यात आली आहे. याचबरोबर जिल्हय़ातील नऊ तालुक्मयांमधील सर्व व्यवहार सुरू करण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. बेळगाव, रायबाग आणि हुक्केरी तालुका वगळता इतर तालुक्मयातील सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरू करण्यासाठी प्रयत्न करा. हे करत असताना सोशल डिस्टन्स ठेवण्याबाबत काळजी घ्या. याचबरोबर या तालुक्मयातील अंतर्गत बस वाहतूक सुरू करण्याबाबतही त्यांनी सूचना केली आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, याचबरोबर पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी येथील समस्यांबाबतची माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना दिली आहे. आता नऊ तालुक्मयातील सर्व व्यवहार सुरळीत होणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. या व्हिडिओ कॉन्फरन्सला केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी, खासदार प्रभाकर कोरे, विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी, आमदार महांतेश कवटगीमठ, आमदार अनिल बेनके, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी, आयजीपी राघवेंद्र, पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. राजेंद्र, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी हे उपस्थित होते.