रवींद्र केसरकर / कुरुंदवाड
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पंचगंगा परिक्रमा जलसमाधी पदयात्रा आंदोलन हाती घेतले होते. या आंदोलनाच्या सांगता सभेच्या वेळी प्रांताधिकारी विकास खरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत सोमवारी दुपारी तीन वाजता मुंबई येथे पूरग्रस्तांच्या मागण्या संदर्भात बैठकीचे लेखी पत्र माजी खासदार राजू शेट्टी यांना जाहीर सभेत दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित झाले हे मात्र मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक निष्फळ झाल्यास शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा उग्र आंदोलनासाठी तयार राहावे असे आवाहन करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
या परिक्रमा सांगता सभेत बोलताना माजी खासदार राजू शेट्टी पुढे म्हणाले कृष्णा व पंचगंगा या दोन नद्याला येणाऱ्या महापुरामुळे महाराष्ट्र व कर्नाटक राज्याला फार मोठा फटका बसत आहे कोल्हापूर सांगली व कर्नाटक परिसरात आहेत 130 फुल आहेत या पुलांचा तसेच तसेच राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यासाठी टाकलेले भराव यावेळी पडणारा जादा पाऊस आणि आणि अलमट्टी धरणाची वाढवलेले उंची अशा अनेकविध कारणांमुळे महापुराचा सामना करावा लागत आहे महापूर जी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून याप्रमाणे केंद्राने मदत करावी ती मागणी करत संकटामुळे गेल्या 15 व्या वर्षात चार वेळा मानवनिर्मित महापूर आल्यामुळे येथील सर्व शेती उद्ध्वस्त झाली आहे महापुराचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसला आहे यामुळे भिंत महापूर थांबवणे अशक्य आहे असे सांगून ते पुढे म्हणाले केंद्रीय जल आयोग महापुरावर नियंत्रण ठेऊ शकतो हे आयोग स्वायत्त आहे त्यामुळे केंद्र शासनाने पुढाकार घेऊन हा पूर कायमचा थांबवण्याच्या दृष्टीकोनतुन उपाय योजना राबविण्याची गरज आहे.
केंद्र शासन राज्यशासनाला सापत्नपणाची वागणूक देत असलेने महाराष्ट्र वर अन्याय
राज्यातील नागरिक विविध रूपाने जे कर भरतात त्याचा भरमसाठ निधी शासनाकडे जमतो असे असताना पूरग्रस्त यांना मदत करण्यात दिरंगाई होत आहे साखर कारखाने हमी देण्यासाठी राज्यशासन कोट्यवधी रुपयांची जबाबदारी उचलते मात्र महापूर ग्रस्तकंडे ढुंकून पाहण्यास तयार नाही एव्हडा मोठा महापूर येऊन राष्ट्रीय आपत्ती केंद्रीय पथक फिरकले नाही. विविध पुलांना कमानी ऐवजी पाईप घातल्या जात आहेत .पुनर्वसनाचा प्रश्न रखडला गेला आहे. शेतीच्या पंचनाम्याचे काम अद्याप अपुरे आहे आमची लाकडे नदीवर गेल्यावरच तुम्ही उपाययोजना करणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पीक कर्ज विद्यार्थी फी माफ व्हावी 100 टक्के नुकसान भरपाई मिळावी अश्या मागण्या केल्या.
केंद्र सरकार आपत्ती निवारण मध्ये मोठा निधी शिल्लक आहे. तो निधी गुजरातला उपलब्ध होतो तो निधी महाराष्ट्र ला मिळावा यासाठी मुख्यमंत्री यांनी राष्ट्रपती यांना शिष्टमंडळाद्वारे भेटावे. असा ठराव यावेळी करण्यात आला याला हात उंचावून जनासमुदायाने मान्यता दिली.यावेळी प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, नेते सावकार मादनाईक , सचिन शिंदे, अमोल विभूते यांची मनोगते झाली.
पंतप्रधान काय फक्त गुजरातचे आहेत काय ?
माजी खासदार राजू शेट्टी केंद्र सरकारवर टीका करताना कोणत्याही राज्यावर आपत्ती आल्यास आपत्ती निधीतून त्या राज्याला मदत दिली जाते वादळ आले व ते गुजरात कडी सरकले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात साठी एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले व दोन दिवसानंतर आपण लगेच भेट दिली मात्र महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे साधी कोकण परिसराला या वादळाचा मोठा फटका बसला इकडे केंद्राचा एकही निधी फिरकला नाही पंतप्रधान हे गुजरातचे असा प्रश्न पडतो असे ही ते यावेळी म्हणाले .