ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह 9 आमदारांना एका मारहाण प्रकरणी विशेष न्यायालयाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्वांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. 2018 मधील हे प्रकरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन्य 9 आमदारांवर तत्कालीन मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. पण आता हा आरोप सिद्ध न झाल्याने सर्वांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणी दिल्लीतील विशेष न्यायालयाने आपचे आमदार अमानतुल्लाह आणि प्रकाश जरवाल यांना राउज एव्हेन्यू कोर्टाने आरोपी ठरविले आहे.
न्यायालयाकडून निर्दोष सुटका झाल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सत्याचा विजय असे ट्विट केले आहे. तर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुख्य सचिवांना मारहाण केल्याच्या खोटय़ा आरोपामधून निर्दोष करण्यात आले आहे. सत्यमेव जयते असे देखिल म्हटले आहे.
दरम्यान, 2013 मधील हे प्रकरण असून 19 फेबुवारी रोजी मुख्य सचिव अंशु प्रकाश हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठकीसाठी गेले असता बैठकीनंतर आपच्या आमदारांनी केजरीवाल यांच्या समोर अंशु प्रकाश यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.