ताजा भाजीपाला उपलब्ध : बाजाराचा विस्तार होऊन दिवसेंदिवस गर्दी, आठ ते दहा गावातील नागरिकांना होतोय लाभ
युवराज पाटील /सांबरा
पूर्व भागातील मुतगा येथे भरणाऱया आठवडा बाजारामुळे शेतकऱयांना भाजीपाला विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. तर नागरिकांनाही ताजा भाजीपाला उपलब्ध होत आहे. त्यामुळे येथील बाजाराचा विस्तार होत असून दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली आहे. या बाजारात भाजीपाल्यासह कडधान्य, फळे व इतर दैनंदिन वस्तू मिळत असल्याने नागरिकांची चांगली सोय होत आहे. अशाच प्रकारे जर बाजार अनेक गावात भरू लागले. तर शेतकऱयांच्या मालाला चांगला भाव मिळणार आहे. यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
सन 2002-03 मध्ये ग्रामपंचायतीमार्फत येथे आठवडी बाजार सुरू करण्यात आला. त्यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष म्हणून शामराव भैरु पाटील होते. त्यांच्या व इतर ग्रा पं सदस्यांच्या प्रयत्नातून सदर बाजार सुरू करण्यात आला होता. गावातील शेतकऱयांना गावातच बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांच्या भाजीपाल्याला चांगला दर मिळावा, या हेतूने सर्वांनी आठवडी बाजार सुरू केला. तेव्हापासून येथे दर रविवारी आठवडी बाजार भरतो. सुरुवातीच्या काळात केवळ गावातील व उपनगरातील लोक या बाजाराला येत असत. मात्र सध्या बाजाराचा वाढलेला विस्तार पाहता किमान आठ ते दहा गावातील नागरिकांना या बाजाराचा लाभ होत आहे.
मुतगा, निलजी, सांबरा, बसवन कुडची, देवराज अर्स कॉलनी, बसरीकट्टी, अष्टे, मुचंडी, कलखांब व आसपासच्या परिसरातून नागरिक येथे बाजाराला येत असतात. तर बेळगाव-बागलकोट महामार्गावरून जाणाऱया वाहनचालकांची येथे गर्दी पाहायला मिळते. येथे ताजा भाजीपाला योग्य दरात मिळत असल्याने परगावचे नागरिक येथे आपली वाहने थांबवून भाजीपाला खरेदी करताना पहावयास मिळतात.
या बाजारात सर्व प्रकारचा भाजीपाला, सर्व प्रकारची कडधान्ये, फळे व दैनंदिन वस्तू उपलब्ध होत असल्याने नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उठते. येथे सर्वच साहित्य उपलब्ध होत असल्याने येथील नागरिकांचे बेळगावला जाणे विशेषतः कमीच असते. या बाजारात मुतगा, सांबरा, शिंदोळी, बसरीकट्टी, निलजी, करडीगुद्दी, मारिहाळ येथील शेतकरी व बेळगाव येथून इतर विपेते येतात. काही वर्षापूर्वी येथील बाजारपेठेत ग्रामपंचायतीच्या निधीतून पेव्हर्स बसविण्यात आले आहेत. त्यामुळे व्यापाऱयांना भाजी विकण्यासाठी बसण्याची सोय झाली आहे.
स्वच्छतागृहे उभारण्याची मागणी
या ठिकाणी येणाऱया व्यापाऱयांसाठी स्वच्छतागृह नसल्याने गैरसोय होत आहे. विशेष करून महिला वर्गाची कुचंबणा होत आहे. ग्रामपंचायतीने स्वच्छतागृह उभारल्यास त्यांची सोय होऊ शकते. यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायतीने शेड उभारल्यास सोयीचे
येथील बाजारपेठेमुळे आमचा चांगला व्यापार होतो. ग्रामपंचायतीने बसण्यासाठी पेव्हर्स बसविल्यामुळे चांगली सोय होत आहे. मात्र पावसाळय़ात गैरसोय होते यासाठी ग्रामपंचायतीने शेड उभारल्यास सोयीचे होऊ शकते.
हेमंत चौगुले विक्रेत्या
ग्राहकांचा चांगला प्रतिसाद
येथील बाजारपेठेमुळे आम्हाला भाजीपाला विकण्यासाठी अत्यंत सोयिस्कर झाले आहे. आम्ही मुतगा बाजारासह सांबरा व बाळेकुंद्री खुर्द येथील बाजारालाही जातो. तेथेही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सरिता पाटील (विक्रेत्या)
भाजीपाला योग्य दरात मिळतो
आम्ही या बाजाराला गेल्या अठरा-एकोणीस वर्षापासून येत आहे. येथे थेट शेतातून आणलेला ताजा भाजीपाला आम्हाला योग्य दरात मिळतो. त्यामुळे आम्ही नियमितपणे येथील बाजाराला येत असतो.
सदानंद देसाई (मुतगा)
बाजाराच्या विस्तारात दिवसेंदिवस वाढ
येथील बाजारामुळे शेतकऱयांना गावातच बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ते आपला शेतातील भाजीपाला येथे आणून विकत आहेत. येथील बाजाराला परगावचे शेतकरीही भाजीपाला घेऊन येत आहेत. व भाजीपाला खरेदी करण्यासाठी परगावचे नागरिकही मोठय़ा संख्येने येतात. त्यामुळे बाजाराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
परशराम पाटील (मुतगा)