चाळीस तोळे चांदीचे दागिने, 5 ग्रॅम सोने लंपास : आणखी एका घरातही चोरीचा प्रकार उघडकीस : तपास सुरू
वार्ताहर / सांबरा
तालुक्मयात चोऱया व घरफोडय़ांचे सत्र सुरूच असून चोरटय़ांनी मुतगा येथील श्री लक्ष्मीदेवी मंदिर व मेनरोडवरील घरात चोरी केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. चोरटय़ांनी मंदिरातील चाळीस तोळे चांदीचे दागिने, 5 ग्रॅम सोन्याचे दागिने व देणगी पेटीतील रोख रक्कम लांबविली आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
येथील लक्ष्मी गल्लीतील लक्ष्मी मंदिराचे पुजारी गोविंद सुतार हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी मंदिरात पूजेसाठी आले असता चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. लागलीच त्यांनी देवस्थान कमिटीच्या सदस्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मारिहाळ पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. मारिहाळ पोलीस स्थानकाचे सीपीआय मंटूर हे सहकाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी 40 तोळय़ाचे चांदीचे दागिने, पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व कर्णफुले व देणगीपेटीतील रोख रक्कम चोरटय़ांनी लांबविली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
श्वानपथकाला पाचारण
पोलिसांनी तातडीने बेळगाव येथून श्वानपथकाला पाचारण केले. बेळगाव-बागलकोट रोडवरील कल्लाप्पा जिन्नाप्पा चौगुले यांच्या घरापर्यंत जाऊन श्वान तेथे घुटमळत राहिले. त्यामुळे चोरीचा दुसरा प्रकारही उघडकीस आला.
कल्लाप्पा चौगुले यांच्या घरीही चोरी
येथील रहिवासी कल्लाप्पा जिन्नाप्पा चौगुले हे बेंगळूरला आपल्या पाहुण्यांच्याकडे गेले आहेत. चोरटय़ांनी याच संधीचा फायदा घेत घरफोडी केली आहे. चोरटय़ांनी मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व तिजोरी फोडून सोन्याचे दागिने लांबविल्याचा अंदाज आहे. मात्र, चोरटय़ांनी काय काय लांबविले, हे चौगुले कुटुंबीय बेंगळूरहून परतल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
ग्रामीण भागात चोऱयांचे सत्र सुरूच असून चोरटय़ांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मात्र, चोऱयांचे सत्र थांबविण्यासाठी पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरातही चोरीचा प्रकार घडला होता.
सीसीटीव्ही बसवणे गरजेचे
मुतगा ग्राम पंचायतीने गावातील मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत, अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे. मुतगा ग्राम पंचायत ही पूर्वभागातील महत्त्वाची पंचायत म्हणून ओळखली जाते. त्यामुळे ग्राम पंचायतीने गावामध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवून गावच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे. तसेच ग्रामस्थांच्या हिताच्यादृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
रात्रीची गस्त वाढविण्याची गरज
सामान्य नागरिकांकडून वेगवेगळय़ा कारणाखाली दंड आकारणाऱया पोलीस यंत्रणेने जरा सामान्य नागरिकांकडेही लक्ष द्यावे, असा सूर नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरटय़ांना गजाआड करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.