प्रतिनिधी / पणजी
मुरगांव पालिका कर्मचारी संपाविषयी कार्लुस आल्मेदा यांनी नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांना दोष दिला असून त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. गेल्या दोन – तीन दिवसांपासून संपामुळे शहरात कचरा पडून आहे. त्याचा त्रास जनतेला होत असून मंत्र्यांनी या प्रकरणी त्वरित हस्तक्षेप करुन तोडगा काढण्याची आणि कचरा विल्हेवाट लावण्याची गरज आहे. या प्रकरणात मंत्रीच जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली. या प्रकरणास नगरसेवकही कंटाळले असून त्यांनी वास्को पालिकेस चांगला सक्रिय मुख्याधिकारी देण्याची मागणी केल्याची माहिती आल्मेदा यांनी दिली. पालिका कामगारांनी कचरा हटवला नाही तर नगरसेवक स्वखर्चाने तो हटवतील, असेही ते म्हणाले.