ऑनलाईन टीम / लखनऊ :
कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉक डाऊन तीन मे पर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर स्थलांतरित मजुरांचे आंदोलन, पोलीस आणि डॉक्टरांवर हल्ले अशा अनेक घटना समोर येत आहेत.
अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झाली. येथील लोकांनी डॉक्टर आणि पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चांगलीच शाळा घेतली आहे.
ते म्हणाले, या संकटाच्या काळात पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी जोखीम पत्करून आपल्यासाठी काम करत आहेत. या लोकांवर हल्ला करणे ही एक मोठी चूक आहे. त्यामुळे अशा चुकीला क्षमा केली जाणार नाही.
अशा प्रकारे हल्ले करणाऱ्या दोषींना आपत्कालीन नियंत्रण अधिनियम आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम च्या अंतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल तसेच त्यांच्याकडून झालेल्या संपत्तीचे नुकसान देखील त्यांच्याकडून सक्तीने वसूल केले जाईल.
तसेच जिल्हा प्रशासनाने अशा समाज घटकास शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे ही योगी यांनी यावेळी सांगितले.