मराठा मंडळ संस्थेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन : कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पहिल्या लाटेनंतर दुसऱया लाटेमध्येही मोठे नुकसान झाले आहे. तर तिसरी लाट ही मुलांना धोकादायक असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही धोका होवू नये यासाठी दहावीची परीक्षा रद्द करावी, अशी मागणी मराठा मंडळ संस्थेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गोवा राज्याने दहावीची परीक्षा रद्द करण्याचे जाहीर केले आहे. तशाच प्रकारे कर्नाटकानेही निर्णय घेवून ही परीक्षा रद्द करावी. कारण विद्यार्थ्यांना परीक्षेला येताना त्यांच्या बरोबर पालकांनाही शाळेपर्यंत यावे लागते. याचबरोबर शिक्षकांनाही त्या काळात थांबावे लागते. पर्यवेक्षक म्हणून शिक्षक काम करतात. पोलिसांनाही त्या ठिकाणी सुरक्षेचे काम करावे लागणार आहे. यासाठी 17 लाखहून अधिक जणांना प्रवास करावा लागणार आहे. हा एक प्रकारे मोठा धोका आहे. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार करून दहावीची परीक्षा रद्द करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत काही शिक्षकांचाही मृत्यू झाला आहे. 7 जून रोजी ही परीक्षा होणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र अजूनही कोरोना असल्यामुळे ही परीक्षा घेणे तसे कठीणच आहे. तेंव्हा त्याचा गांभीर्याने विचार करून परीक्षा रद्द करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. राज्यात दहावीचे साडेआठ लाख विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्या सर्वांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे. तेंव्हा परीक्षा देणे अशक्मय दिसत आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अध्यक्षा राजश्री नागराजू व इतर शिक्षक उपस्थित होते.