प्रत्येक कुटूंबातील मुलांना “आपल्यावर प्रेम केलं जातंय, आपण एका कुटुंबाचा भाग आहोत, आपणही काहीतरी अर्थपूर्ण करू शकतो आणि आपल्या जिज्ञासेला मोठय़ांकडून प्रोत्साहन दिलं जातं’’ असे वाटणे गरजेचे आहे. तसंच असे तुमच्या मुलाला वाटण्याजोगं वातावरण तयार करण्यात जर तुम्हाला यश आलं, तर मुलांच्या मेंदूचा योग्य विकास आपोआप होईल. “पालक म्हणून आपली भूमिका ही एक मेकॅनिकल प्रोसेस घडवून आणण्याची नव्हे तर सुदृढ, समंजस व संवेदनशील मानवांचा विकास घडवून आणण्याकरता पोषक वातावरण निर्माण करण्याची आहे.’’
मात्र सद्यस्थितीमध्ये म्हणजे ह्या कोविडच्या आणि ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमामध्ये हे कितपत शक्मय आहे किंबहुना किती पालक असे वातावरण निर्माण करण्यात यश मिळवतात हे पाहणे गरजेचे आहे. अर्थात प्रत्येक पालक हे नेहमी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र सध्याच्या लॉकडाऊन, निर्बंध, यामध्ये हे पालक इतके गोंधळून गेले आहेत की त्यांना मुलांकडे लक्ष देणे कठीण होत आहे. ह्यातून मार्ग म्हणजे ऑनलाईन क्लाससाठी मुलांच्या हातात मोबाईल सोपवून पालक आपले काम, व्यवसाय करण्यात गुंग होतात. अभ्यास चालू असताना मध्येच येणारी नोटिफिकेशन बघून मुलांचे लक्ष विचलीत होते. क्लासमधून मध्येच गायब होऊन मनोरंजनाच्या विश्वात रममाण होणे आणि वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष करणे या सवयी मुलांच्या अंगवळणी पडत चालल्या आहेत. परिणामी अभ्यासाचा बट्टय़ाबोळ होऊ लागला आहे. मुलांचा जर चांगला अभ्यास होणे गरजेचे असेल तर पालकांनी मुलांसाठी वेळ काढून त्यांच्यावर काटेकोर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मात्र दैनंदिन व्यवहारामध्ये हे करणे पालकांना कठीण जात आहे. त्यांची तारांबळ उडत आहे. ह्यामध्ये पालकांची मनस्थिती बिघडत चालली आहे.
मुळातच शालेय शिक्षणाबरोबर मुलांचे जीवनशिक्षण अव्याहतपणे चालूच असते. ते चालू ठेवणे पालकांना गरजेचे असते. प्राथमिक स्तर-6 ते 14 वयोगटातील मुले पालकांवर अवलंबून असतात. मात्र ह्या ऑनलाईन शिक्षणामध्ये पालकांना पुरेसा वेळ देणे शक्मय होत नाही. पालक म्हणून ह्याची पूर्ण कल्पना असते मात्र नोकरी व्यवसाय ह्याच्या वेळामुळे हे शक्मय होत नाही.
ऑनलाईन अभ्यास आणि अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईलच्या अतिवापराने मुलांवर होणारे शारीरिक-मानसिक दुष्परिणाम हे पालकांसाठी आव्हानात्मक होऊ लागले आहे. डोळे, डोके, मान, पाठ दुखणे, मेंदूला थकवा येणे, स्थूलपणा, भूक न लागणे, सतत झोप येणे, चिडचिड होणे, उद्धटपणा, उलट बोलणे, मोबाईलमधील आभासी व्यक्तींच्या जगात वावरणे इत्यादी समस्या उद्भवू लागल्या आहेत. पालकांना हे कसे हाताळावे ह्याची चिंता लागली आहे. आपले दैनंदिन व्यवहार सांभाळून ह्या समस्या सोडविणे हे पालकांसाठी जादाचे काम होऊन बसले आहे. हे कमी म्हणून की काय ह्या मोबाईलमधील ऍपचा वापर करुन माहित नसतानासुध्दा पैशाचे व्यवहार मुले करु लागली आहेत. ऑटो-सेव्ह ऑप्शनमुळे पासवर्ड सेव्ह झालेले असतात. त्यामुळे व्यवहार करणे सोपे होते. इतरही काही सायबर क्राईम म्हणजे पोर्नोग्राफी, व्हिडिओ कॉलिंग, व्हिडिओ अपलोड करणे, सेल्फी अपलोड करणे घडू शकते. ह्यातून नविन समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. हा मनस्ताप पालकांना होऊ लागला आहे.
जोपर्यंत शाळा सुरू होत नाहीत तोपर्यंत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवणे ही शिक्षक आणि पालक दोघांची जबाबदारी आहे. मात्र ह्यामध्ये पालकांची कसरत होऊ लागली आहे. अभ्यासातील बारकावे लक्षात आले नाहीत तरी वाचन, लेखन, गणिती क्रिया, संख्या ज्ञान, सामान्य ज्ञान, निबंध लेखन, पाठांतर इत्यादी सामान्य गोष्टीबाबत पालकांनी जागरूक राहणे गरजेचे ठरत आहे. शिक्षित कुटूंबामध्ये हे कदाचित शक्मय होत असेलही. मात्र पोटापाण्यासाठी झगडणाऱया गरीब वर्गातील मुलांचे पालकांबाबतीत हे शक्मय नाही आहे. हे पालक मुलांच्या भविष्याची स्वप्ने बघतच नाहीत. या मुलांना ऑनलाइन शिक्षणाची कल्पनाच नाही. आर्थिक अडचण, रोजंदारी मिळाली की चूल पेटणार. अशा अवस्थेमध्ये मोबाईल फोन कसा परवडणार. मग ह्या मुलांचे शिक्षण तसेच राहीले. हे दुर्दैव ज्या बालकांच्या नशिबी आले आहे त्यांच्या भविष्याला जबाबदार कोण? अशा परिस्थितीमध्ये पालक काहीही करु शकत नाहीत.
एकूणच काय तर मुलांची “ऑनलाईन’’ असण्याने पालकांची मानसिकता बदलत चालली आहे. सततच्या मोबाईल, लॅपटॉपमुळे, स्क्रिन टाईम कमी कर म्हणून सांगणे व मुलांनी ते न ऐकणे ह्यातून होणारे वाद, आरडाओरड ह्यामुळे घरातील स्वास्थ्य हरवून गेले आहे की काय असे वाटत आहे. ह्याचे दुष्परिणाम पालक नजरेस आणून देण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र मुलांच्या लक्षात येत नाही आहे हे दुर्दैव आहे.
पालकांची अशी अवस्था आहे तर दुसऱया बाजूला शिक्षकांना शिकवण्याची चिंता लागून राहीली आहे. शिकवण्याची पध्दत बदलावी लागली आहे. टेक्नॉलॉजीचा वापर करणे, विविध ऍप वापरणे ते शिकणे हे गरजेचे झाले आहे. पाठाची तयारी ह्या बरोबर हे शिक्षण आवश्यक ठरत आहे. तसेच ऑनलाईन तासावेळी सर्व मुलांना एकाग्र करणे हे शिक्षकांना आव्हानात्मक ठरत आहे. शिकविलेले मुलांना किती समजले ह्या बाबत शिक्षक साशंक आहेत. कारण मुलांची एकाग्रता खंडीत होऊ लागली आहे.
दुसरे म्हणजे प्रत्यक्षात विद्यार्थी जेव्हा शाळेत असतात तेव्हा शिक्षकांशी थेट संवाद साधणे किंवा त्यांना एखादा प्रश्न, शंका विचारणे विद्यार्थ्यांना सोयीचे जाते. शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांचं एक नातं असतं. यामुळे आपल्या आवडीनुसार विद्यार्थी वेगवेगळय़ा शिक्षकांशी विविध विषयांवर चर्चा करत असतात. ह्या व्हर्च्युअल माध्यमामुळे हे नातं मागे पडत चालले आहे. अनेक वेळा विद्यार्थ्यांचे गरजेनुसार समुपदेशन करणे ऑनलाईनमुळे शक्मय होत नाही. ज्यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना संवादाचे हे व्यासपीठ उपलब्ध होत नाही. ऑनलाईन माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांशी बोलणं प्रत्येक विद्यार्थ्याला शक्मय होत नाही. शिक्षकांनाही विद्यार्थ्यांशी पुरेसा संवाद साधता येत नाही आहे आणि याचे कदाचित गंभीर परिणाम भविष्यामध्ये दिसून येणार आहेत.
खरे तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे फायदेही खूप आहेत. किंबहूना ते करुन घेणे शक्मय आहे मात्र प्राप्त परिस्थितीमध्ये फायद्यापेक्षा तोटे जास्त लक्षात येत आहेत. आज समुपदेशन करणाऱया संस्थांमध्ये मुलांना मोबाईलच्या लागलेल्या अतिरिक्त सवयी घालवण्यासाठी येणारे पालक व मुलं यांची संख्या जास्त दिसून येत आहे.
थोडक्मयात काय तर मुलांचा स्क्रीनटाईम, लागलेल्या सवयी बदलण्यासाठी पालकांना आणि जेव्हा शाळा सुरु होईल तेव्हा मुलांची एकाग्रता ठेवणेसाठी शिक्षकांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे हे निश्चित.
-विनायक राजाध्यक्ष, सांगली