सांगली / प्रतिनिधी :
शालेय वयापासूनच आरोग्याबाबत विद्यार्थिनींनी जागरूक राहणे गरजेचे आहे, असे मत डॉ. वंदना पाटील यांनी व्यक्त केले. शांतिनिकेतन कन्या शाळेमध्ये मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन सप्ताह अंतर्गत त्या तज्ञ मार्गदर्शिका म्हणून बोलत होत्या.
शालेय शिक्षण विभाग व युनिसेफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सप्ताहांतर्गत कन्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये डॉ. वंदना पाटील यांनी विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. विद्यार्थिनींच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक आरोग्य तितकेच गरजेचे आहे. मासिक पाळीच्या दिवसांमधील आरोग्यविषयक व आहारासंबंधी काळजी घेण्याचे योग्य मार्गदर्शन त्यांनी केले. याविषयीच्या अंधश्रद्धा दूर करण्यास सजग राहावे असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डी. बी. सरगर यांनी केले. कार्यक्रमासाठी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका समिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी कन्या शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.