वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2020-21 च्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामाला सय्यद मुश्ताक अली चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेने प्रारंभ केला जाणार असून ही स्पर्धा 10 ते 31 जानेवारी दरम्यान सहा विविध राज्यांमध्ये जैवसुरक्ष्ति वातावरणात खेळविली जाणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱया संघांनी आपल्या संबंधित जैवसुरक्षित विभागाकडे 2 जानेवारीपर्यंत रिपोर्ट करणे जरूरीचे आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी संबंधित सहा राज्यांच्या क्रिकेट संघटनेशी संपर्क साधत त्यांना या स्पर्धेची सविस्तर माहिती लेखी स्वरूपात दिली आहे. देशातील राष्ट्रीय क्रिकेट हंगामाला मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेने प्रारंभ केला जाणार आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेऐवजी विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा कमी कालावधीमध्ये घेण्याचा मंडळाचा विचार असल्याचे शहा यांनी सांगितले.