प्रतिनिधी / संगमेश्वर
मुसळधार पावसामुळे आरवली ते बावनदी दरम्यानच्या महामार्गावर रस्त्यावर पाणी आले असून वाहतुकीमध्ये खोळंबा निर्माण होत आहे. सोनगीरी दरम्याने ग्रामस्थांनी महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकी आणि इतर लहान गाड्यांना मार्गदर्शन करून पुढे जाण्यास सांगितले.
परतीच्या पावसाने संगमेश्वरात धुमाकूळ घातला असून सतत पडणाऱ्या पावसाने शेतीत पाणी घुसले आहे. तर खोदून ठेवलेल्या रस्ते व गटारात पाणी साचून ते पाणी महामार्गावर आल्याने वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे.