ऑनलाईन टीम/तरुण भारत
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर बसपा सुप्रीमो मायावती शुक्रवारी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आल्या. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी भाजप आणि सपा या दोन्ही पक्षांवर निशाणा साधला. मुस्लिम समाज बसपासोबत राहिला, पण त्यांची संपूर्ण मते समाजवादी पक्षाकडे वळली, असे त्या म्हणाले. त्यामुळे बसपचे मोठे नुकसान झाले. मुस्लिम समाजाने बसपाऐवजी सपावर विश्वास ठेवण्याची मोठी चूक केली आहे. तर मुस्लिमांची मते एकतर्फी जात असल्याचे पाहून इतर जातींची मते भाजपकडे वळली. त्याचा फटका बसपालाही बसला आहे. तसेच मुस्लिम मतेही दलित मतांमध्ये मिसळली असती तर पश्चिम बंगालसारखा चमत्कार घडू शकला असता. त्याच परिणामाची पुनरावृत्ती येथेही झाली आहे. भाजपला फक्त बसपाच रोखू शकते, सपा नाही हे लोक विसरतात, असे मायावती यांनी म्हटले आहे.