सर्दी, खोकला, ताप जरी झाला तरी कोरोना सदृश्य आजार समजूनच उपाय करा- प्रांतांचे डॉक्टरांना आदेश : शहरी भागातील डॉक्टरांची कार्यशाळा
प्रतिनिधी / सातारा
जिह्यात मृत्यू दर गेल्या आठ दिवसांमध्ये वाढताना दिसत आहे. असाच मृत्यूदर कायम राहू नये तो कमी करण्यात यावा यासाठी प्रशासकीय पातळीवरुन वारंवार सूचना येत आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सुचनेनुसार जिह्यातील सर्वच डॉक्टरांना प्रांताधिकाऱयांकरवी कार्यशाळा घेऊन सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता डेथ रेट कमी करण्यासाठी प्रशासनाने ठोस पाऊल उचलले असून खाजगी डॉक्टरांच्या ओपीडीमध्ये जरी सर्दी, खोकला, ताप आलेला रुग्ण आला तरीही त्याच्यावर कोरोना समजूनच उपचार करण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्या रुग्णाची माहिती घेऊन ती आरोग्य विभागाला कळवण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
सातारा जिह्यात दररोज कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिह्यातील सर्वच प्रांताधिकाऱयांना त्यांच्या त्यांच्या भागातील शहरे आणि मोठय़ा गावातील खासगी डॉक्टरांना बोलवून त्यांचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी नेमके काय करावे. त्यांच्या ओपीडीत साधा सर्दी, खोकला, ताप आलेला रुग्ण आला तरीही तो रुग्ण कोरोनाचा रुग्ण आहे हेच समजून उपचार झाले पाहिजेत. कारण साधा सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे असलेले रुग्ण पुढे आजार बळावत जावून कोरोनाचे बळी ठरत आहेत. कोरोना रुग्ण म्हणून त्यांच्यावर उपचार करण्यास वेळ लागत आहे त्याकरता अशा स्वरुपाची लक्षणे आढळून येणाऱया रुग्णांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे रुग्ण म्हणूनच उपचार करावेत, असे आदेश देण्यात आलेले आहेत.
त्याच अनुषंगाने सातारा शहरातील 54 डॉक्टरांची कार्यंशाळा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत बापट, कोरोना कक्षाचे प्रमुख प्रणव पवार, वैद्यकीय अधिकारी श्रीमती गोखले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेनंतर ‘तरुण भारत’शी बोलताना सातारचे प्रांत मिनाज मुल्ला म्हणाले, डॉक्टर वर्षभर योद्धा म्हणून कार्य करतात. त्यांचे धैर्य वाढवणे फार महत्वाचे आहे. या प्रक्रियेत पूर्णतः समावेश करुन घेणे हे आहे. आपल्याकडे डेथ रेट वाढत आहे. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या म्हणण्यानुसार उशिरा रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. 72 तासात ट्रीटमेंट नाही मिळाली तर प्रॉब्लेम होवू शकतो. त्यामुळे त्यामुळे तुमच्याकडे जे रुग्ण येतात. ते कोवीड सदृश असे गृहीत धरुनच ट्रीटमेंटं केली तर त्यांना एक जाणीव होते. आणि ते जे इतर ठिकाणी फिरत राहतात त्याच्याऐवजी गव्हमेंटने सीसीसी असेल ईसीएससी असेल जंबो कोवीड हॉस्पिटल असेल या ठिकाणी जावून योग्य वेळी सल्ला मिळाला तर उपचार चांगले मिळतील अन् रुग्ण वाचू शकतो. दुसरी लाट आहे. आपण पिकमध्ये आहोत. माझेही नागरिकांना आवाहन आहे. डॉक्टर सांगतात त्यानुसार सर्वांनी स्वतःची काळजी घेवून आपल कुटुंब आपली जबाबदारी ओळखून घरी थांबावे. जरी टेस्ट करताना एखादा निगेटीव्ह आला तरी तो पुन्हा पॉझिटीव्ह येवू शकतो त्यामुळे असे नाही की निगेटीव्ह टेस्ट आली म्हणून खंबीर राहू नका तर गंभीर व्हा. किंवा लसीकरण केल्यावर आपल्याला होतच नाही असेही नाही. परंतु सुरक्षा म्हणून लसीकरण तत्काळ करुन घ्या. लसीकरण केल्यानंतरही मास्क लावला पाहिजे. सोशल डिस्टन्स ठेवले पाहिजे असे आवाहन केले आहे.
डॉक्टरांनी आलेल्या रुग्णांची माहिती गुगल शिटला भरावी
सातारा शहरातील जे खासगी डॉक्टर सेवा देतात. त्यांच्याकडील ओपीडीत जे रुग्ण येतात. त्यांची सर्व माहिती गुगल शिटमध्ये भरुन ते शासनाकडे सादर करायची आहे. रुग्णांची माहिती मिळाल्यास त्यांच्यापर्यंत कॉन्टक्ट करण्यास सोपे जाईल. त्या रुग्णांनी जरी आजार दडवले तरीही त्यांच्यावर उपचार करणे सोपे जावून कोरोना डेट रेट रोखता येईल, अशा सूचना यावेळी दिल्या.