संचारबंदीतून मेंढपाळांना सवलत देण्याची मेंढपाळातून मागणी
सांगरुळ /प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील मेडपाळ दरवर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात कमी पावसाच्या प्रदेशात जात असतात. चालू वर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी देशभरात संचार बंदी सुरू असल्याने. मेंढपाळांना त्याचा जोरदार फटका बसला आहे. संचार बंदीमुळे परजिल्ह्यात जाण्यात बाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. सध्या ज्याठिकाणी आहे तेथेच अडकून पडल्यामुळे मेंढ्यांना चारा कमी पडू लागला आहे. तीव्र गुणांच्या झाल्याबरोबरच वळू वादळी पावसाचा फटका मेंढरांच्या आरोग्यावर होत आहे. यामुळे मेंढरांच्या आरोग्यासाठी पाऊस सुरू होण्याअगोदर देसात जाण्याचे वेध मेंढपाळांना लागले आहेत. संचारबंदीमूळे निर्माण झालेल्या स्थलांतराच्या अनिश्चिततेमुळे मेंढपाळ आत द्विधा अवस्थेत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात पाच लाखावर धनगर समाजाची लोकसंख्या असून यामधील समारे एक लाखावर अधिक लोकांचा मेंढपाळाचा व्यवसाय आहे .या लोकांची संपूर्ण उपजीवीका शेळ्या-मेंढ्या पालन व्यवसायावर अवलंबून असते .कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळेयेथील हवामान मेंढरांच्या आरोग्यास अपायकारक असते . तसेच सर्वत्र पिकांची पेरणी झाल्यामुळे मेंढरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो .यामुळे साधारणता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे मेंढपाळ सांगली, सातारा, मिरज, पूणे, बारामती, लोणंद बार्शी, सोलापूर, पंढरपूर जिल्हयासह मध्य महाराष्ट्र व कर्नाटक जिल्ह्यातील विजापूर या कमी पावसाच्या भागांमध्ये जात असतात . या भागात पावसाळ्यात मेंढरांना पोषक हवामान असते तसेच मेंढरांना चरण्यासाठी चारही मुबलक प्रमाणात असतो .यामुळे मेंढरांची वाढ चांगली होण्यास मदत होते .या वर्षी मेंढपाळ लोकांच्या समोर कोरोनाचे संकट उभे असल्याने द्विध्दा मनस्थिती निर्माण झाली आहे.
दरवर्षी या दिवसात मेंढपाळांची स्थलांतरित होण्याची तयारी सुरू झालेली असते .चालू वर्षी शासनानेही अद्याप काही निर्णय जाहीर न केल्यामुळे मेंढपाळांच्या मनामध्ये द्विधा अवस्था निर्माण झाली आहे .मेंढपाळांच्या सारखीच पर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था असून परजिल्ह्यातील काही शेतकर्यांचे फोन या मेंढपाळांना येत असून चालू वर्षी येणार आहात का अशी विचारणा होत असल्याचे काही मेंढपाळांनी सांगितले आहे. मेंढपाळांची वस्ती तसेच वावरही शेती तसेच माळ मुरुड या भागात असल्याने गावातील नागरिकांची त्यांचा फारसा संपर्क होत नाही. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने लवकरात लवकर मेंढपाळांच्या या समस्येतून मार्ग काढून मेंढपाळांना लॉक डाऊन मधून वगळावे आणि मेंढरांच्या सुरक्षितेसाठी कमी पावसाच्या प्रदेशात जाण्याचा मार्ग सुकर करावा अशी मागणी मेंढपाळ व धनगर समाजातून होत आहे .
मेंढपाळांना लॉक डाऊन मधून सवलत द्यावी
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कडक उन्हा बरोबरच वादळी व वळीव पावसाचा त्रास मेंढपाळांना सहन करावा लागत आहे .लॉक डाऊन मुळेही मेंढपाळ ज्या गावात आहेत तेथेच अडकून पडले आहेत .उन्हाळी पिकांची काढणी तसेच पावसाळी पिकांची पेरणी करण्यासाठी मशागतीची कामे सुरू असल्याने मेंढरांना चरण्यासाठी चाऱ्याचाही तुटवडा भासत आहे .जास्त पावसामुळे दलदल व डासामुळे मेंढरांना त्रास होत असल्याने आम्ही दरवर्षी कमी पावसाच्या भागात जात असतो .शासनाने लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन मेंढपाळाना दया दाखवून लॉक डाऊन मधून वगळावे ही समस्त मेंढपाळांची मागणी आहे
कोकरांना उन्हाच्या झळा असहाय्य
उन्हामुळे लहान कोकरांना उष्णतेचा जोरदार फटका बसत असून कोकरासाठी मेंढर बसलेल्या तळापासून इतरत्र झाडांचा आसरा घ्यावा लागत आहे .शासनाने मेंढपाळांच्या अडचणीचा विचार करून लवकरात लवकर लॉक डाऊन मधून सवलत द्यावी
)