लष्करप्रमुखांकडून सैनिकांना सज्जतेचे आदेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत-चीन दरम्यान सुरू असलेला तणाव अद्यापही निवळलेला नाही. चीन आणि भारताच्या लष्कराच्या कमांडर स्तरावरील बैठकीतून कोणताही अंतिम तोडगा न निघाल्याने आता आता मेजर जनरल स्तरावरील बैठकीत चर्चा करण्यात येत आहे. यासंबंधीची बैठक दौलत बेग ओल्डी येथे सुरू झाल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली. यापूर्वी पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेल्या तणावातून मार्ग निघण्याची शक्मयता धुसर झाल्यानंतर गेल्या आठवडय़ातह चर्चेच्या फेऱया झाल्या होत्या. दरम्यान, तणाव वाढल्यास पूर्णपणे दक्ष राहण्याचे आदेश लष्करप्रमुख नरवणे यांनी आपल्या सहकाऱयांना दिले आहेत.
लडाखमध्ये 15 जूनच्या रात्री गलवान खोऱयात झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले तर चीनचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले. त्यानंतर पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांनी आपले हजारो सैनिक, रणगाडे, तोफा, फायटर विमाने तैनात केली असल्याचीही माहिती समोर आली होती. यानंतर भारतानेही आपले सैन्य वाढवले आहे.
पूर्व लडाखमध्ये भारत-चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी लष्कराच्या कमांडरांना कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. कुठल्याही क्षणी कारवाईसाठी सज्ज राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. लष्करासोबतच हवाई दलानेही लडाख, उत्तर सिक्कीम, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश क्षेत्रातील संपूर्ण एलएसीवर ऑपरेशनल स्तरावर तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. लष्करप्रमुख दोन दिवसांच्या पूर्व कमांडच्या दौऱयावर होते. त्यावेळी त्यांनी हय़ा सूचना केल्या.