प्रतिनिधी/ सातारा
वाई तालुक्यातील मेणवली गावाला इतिहास आहे.पुणे येथून येऊन नाना फडणवीस यांनी मेणवलीला वाडा बांधला होता.त्या वाडय़ाचे नूतनीकरण गेल्या दीड वर्षेपासून मेणवलीकर फडणवीस कुटूंबियांकडून करण्यात आले आहे.त्यामुळे आता हा वाडा जणू पहातच रहावा वाटत आहे.नुकतेच जिल्हा प्रशासनाने पर्यंटाकाना प्रेक्षणीय, इतिहासाकालीन स्थळे खुली केली आहेत.त्या पार्श्वभूमीवर मेणवली येथील वाडा ही येणाया पर्यटकांची काळजी घेऊन खुला करण्यात आला आहे.
मेणवली येथील नाना फडणवीस यांच्या वाडय़ाला अनेक पर्यटक इतिहास प्रेमी आवर्जून भेट देत असतात.या वाडय़ाच्या पाठीमागे असकेल्या घाटावर सतत चित्रीकरण होत असतात.नुकतेच दोन दिवसांपूर्वी चित्रीकरण झाले.वाडय़ाचे जतन करायचा आणि ऐतिहासिक वारसा जपायचा निर्धार नाना फडणवीस यांच्या कुटूंबियांनी केला.गत दीड वर्षांपूर्वी कामाला प्रारंभ झाला. जिह्यात जे जुने वाडे आहे तेथील लाकडी आणि दगडी वस्तू घेऊन त्या वाडय़ाच्या नूतनीकरण करण्यासाठी वापरल्या गेल्या.वाडय़ाला एकून असलेल्या तीन दरवाजा पैकी सध्या एकच दरवाजा सुरू ठेवला आहे.तेथून आतमध्ये आल्यावर प्रवेश करताच वाडय़ात माहीती देण्यासाठी एक गाईड आहेत.ते नाना फडणवीस यांच्याबाबत आणि वाडय़ाबाबत माहिती देतात.या वाडय़ाची नूतनीकरण केल्यामुळे वाडय़ातले कारंजे, गणपती मूर्ती, नाना फडणवीस यांच्या बसण्याचे ठिकाण, वाडय़ावरील बुरुज, मुख्य दरवाजा पाहण्यासारखा असून अगदी आतमध्ये स्वच्छता आणि टापटीपपणा आहे.कोरीव लाकडी काम पुन्हा संवर्धन करण्यात आले आहे.तब्बल एक कोटी रुपये खर्च करून सर्वधन करण्यात आले आहे.अजून काम सूरु आहे.आपला ऐतिहासिक वारसा जतन करूया, अमूल्य ठेवा जपुया, अशी माहिती नाना फडणवीस यांचे वंशज नितीन मेणवलीकर-फडणवीस यांनी दिली.
मोडी लिपीचा प्रसार
वाडा पहायला येणाया प्रत्येक पर्यटकाला त्यांचे नाव मोडी लिपीत लिहून दिले जात आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या व पेशव्यांच्या काळात मोडी लिपी होती.त्याच लिपीचे संवर्धन नाना फडणवीस यांच्या वारसाकडून सूरु आहे.