ऑनलाईन टीम / मेरठ :
मेरठमधील अलीपूर गावात शुक्रवारी पहाटे छापा टाकण्यासाठी गेलेल्या विद्युत विभागाच्या पथकावर गावकऱ्यांनी प्राणघातक हल्ला केला. गावकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत एसडीओ महावीर आणि कंत्राटी कामगार राजकुमार जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर कार्यकारी अभियंता नीरज सक्सेना यांच्या नेतृत्वाखाली विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
पोलीस निरीक्षक अरविंद मोहन शर्मा यांनी लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे आश्वासन विद्युत कर्मचाऱ्यांना दिले आहे.