सकाळपासूनच आंदोलक-पोलिसांमध्ये पेटला संघर्ष : बंदूक, धारदार शस्त्र्रांसह आंदोलक उतरले रस्त्यावर : आंदोलकांच्या आक्रमकतेमुळे : पोलीस फौजफाटा माघारी : आंदोलकांचा पोलिसस्थानकावर रात्री उशिरापर्यंत ठिय्या : मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा करण्यावर आंदोलक राहिले ठाम : शेळ मेळावलीसह धामसेवासियांचाही आंदोलनात सहभाग
उदय सावंत / शेळ मेळावली
गुळेली पंचायतक्षेत्रातील शेळ मेळावली या ठिकाणी उभारण्यात येणार असलेल्या आयआयटी प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन काल बुधवारी चिघळले. सर्वेक्षणाचे काम रोखण्याचा प्रयत्न करणाऱया आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. महिलांवर अत्याचार केल्यानंतर आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत सात महिला पोलीस जखमी झाल्या. लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ वाळपई पोलीस स्थानकावर भव्य मोर्चा काढून रात्री उशिरापर्यंत पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी माफी मागावी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आंदोलनकर्त्यांशी थेट चर्चा करावी अशा दोन मागण्या लावून धरण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत आंदोलक पोलिसस्थानकावर होते.
जखमी झालेल्या महिला पोलिसांना वाळपई सामाजिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंदोलकांपैकी अनेक महिला व पुरुष जखमी झाले असूनही त्यांनी उपचार करून घेण्यास नकार दर्शविला आहे. आंदोलनामध्ये सत्तरी तालुक्मयातील अनेक गावातील नागरिकांनी सहभाग दर्शविला असून येणाऱया काळात या आंदोलनामध्ये जनता मोठय़ा प्रमाणात सहभागी होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांनीही या आंदोलनामध्ये उडी घेतलेली आहे.
बंदूक, धारदार शस्त्र्रांसह आंदोलक उतरले रस्त्यावर
या प्रकल्पाच्या विरोधात गेल्या चार महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. मंगळवारी सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या पथकाला हाकलून लावल्यानंतर पुन्हा एकदा सर्वेक्षण सुरू केल्यास बुधवारपासून आंदोलनाला हिंसक वळण लागणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला होता. आंदोलकांनी धारदार शस्त्रे घेऊन आंदोलनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आल्यानंतर काल बुधवारी सकाळपासून आंदोलक कोयते, कुऱहाडी, बंदूक घेऊन रस्त्यावर उतरले होते.
धामसे येथे सुरु झाला आंदोलक-पोलिसात संघर्ष
बुधवारी सकाळी आंदोलकांनी सर्वेक्षण करणाऱया पकथकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन तास फिरूनही सर्वेक्षणाचे पथक त्यांच्या हाती लागले नाही. शेवटी धामसे गावातून सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात आंदोलक धामसे गावातील रानातून आयआयटी प्रकल्पाच्या संपादित जमिनीमध्ये घुसले. काही अंतरावर गेल्यानंतर आयआयटी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू असल्याचे त्यांना समजले. यामुळे मोठय़ा प्रमाणात उपस्थित असलेले विरोधक व पोलीस यांच्यासमोर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही बाजूने आयआयटी विरोधक व दुसऱया बाजूने पोलीस यामुळे एक तासभर संघर्ष सुरु होता.
उपजिल्हाधिकाऱयांचे चर्चेचे आवाहन आंदोलकांनी धुडकावले
आयआयटी सर्वेक्षणाचे काम सुरू करू देणार नाही. अशा प्रकारची भूमिका आंदोलनकर्त्यांनी लावून धरली. यामुळे जवळपास एक तास पूर्णपणे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांनी आंदोलकांना चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले. प्रातिनिधिक स्वरूपात ही चर्चा होणार असून त्यातून चांगले निष्पन्न होणार अशा प्रकारचे आवाहन त्यांनी केले. मात्र सदर आवाहन आयटी आंदोलकांनी धुडकावून लावले. सर्वेक्षणाचे काम बंद करू नका ते सुरूच राहू द्या, अशा प्रकारचे आवाहन करूनही आंदोलनकर्त्यांनी विरोध कायम ठेवल्यानंतर आपल्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा उपजिल्हाधिकाऱयांनी त्यांना दिला. आपल्या कारवाईला आम्ही भीक घालत नाही. सरकारने आतापर्यंत आमच्यावर अन्याय केलेला आहे. यामुळे आता एक तर आयटी प्रकल्प रद्द करा किंवा येणाऱया गंभीर आव्हानांना सामोरे जा, अशा प्रकारची भूमिका आंदोलकांनी घेतली.
लाठीचार्जमुळे सुरु झाली जीवघेणी धुमश्चक्री
अनेकवेळा विनंती व आवाहन करून करूनही आंदोलक रानातच ठिय्या मारून बसल्यामुळे सरकारी यंत्रणसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली. यावेळी लाठीचार्ज करण्याचा आदेश उपजिल्हाधिकाऱयांनी दिल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. त्यावेळी मोठय़ा प्रमाणात पोलिस व आंदोलक यांच्यामध्ये धुमश्चक्री झाली. महिला पोलीस झोपलेल्या महिला आंदोलकांवर मोठय़ाप्रमाणात लाठीचार्ज करत होत्या. यामुळे संतप्त बनलेल्या पुरुष आंदोलकांनी कोणत्याही विचार न करता सदर ठिकाणी असलेले दगड व हातामध्ये आलेली धारदार शस्त्र पोलिसांच्या दिशेने फेकून मारली. यामुळे मोठय़ा प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
धुमश्चक्रीत सहा महिला पोलीस जखमी
यावेळी सहा महिला पोलीस जखमी झाले. त्यांना वाळपई सामाजिक रुग्णालयात 108 सेवेतून उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्यावर सामाजिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंदोलनकर्त्यांनी मोठय़ा प्रमाणात दगडफेक व धारदार शस्त्रे पोलिसांच्या दिशेने फेकून मारल्यामुळे पोलिसांसमोर काढता पाय घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. लाठीचार्ज करण्यापूर्वी वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर यांनी महिलांच्या छातीवर पाय ठेवल्याचा दावा महिला आंदोलनकर्त्यांनी केला. यामुळे मोठय़ा प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
महिलांच्या छाताडावर पाय ठेवण्याचा निंदनीय प्रकार
आंदोलनकर्त्यांची आक्रमक भूमिका व निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर आणखी दगडफेक होण्याची शक्मयता असल्यामुळे ताबडतोब पोलीस फौजफाटा माघारी पाठविण्यात आला. त्यानंतर बैठक घेऊन आंदोलनकर्त्यांनी महिला आंदोलनकर्त्यांच्या छाताडावर पाय ठेवल्याचा आरोप करीत वाळपई पोलीस स्थानकावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला. पोलीस निरीक्षक सागर यांनी अमानुषपणे महिलांच्या छाताडावर पाय ठेवण्याचा प्रकार हा निंदनीय असून ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. यामुळे सरकारला या घटनेची दखल घेऊन चौकशी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत यावेळी बैठकीमध्ये आंदोलनकर्त्याच्या नेत्यांनी व्यक्त केले.
धामसे ग्रामस्थांचाही आंदोलनात मोठय़ा प्रमाणात सहभाग
आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात आतापर्यंत शेळ, मेळावली, धडा, पैकुळ, मुरमुणे आदी भागातील नागरिक रस्त्यावर उतरले होते. बुधवारी झालेल्या या उग्र आंदोलनाला याच पंचायत क्षेत्रातील धामसे गावातील नागरिकांनीही पूर्ण पाठिंबा व पूर्ण सहभाग दिला. यामुळे मोर्चामध्ये धामसे गावातील नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. आज तुम्हाला, उद्या आम्हाला… अशा प्रकारची विचारधारा व्यक्त करीत आयआयटी प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील भूमिपुत्रांवर अन्याय होत असेल तो भविष्यात आमच्यावरही होऊ शकतो अशा प्रकारचे निवेदन करून या आंदोलनाला धामसे गावातील नागरिकांनी जोरदार पाठिंबा दिला. ते मोर्चामध्येही मोठय़ा प्रमाणात सहभागी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
धामसेवासियांनी बंद केला वाळपई-गुळेली रस्ता
आंदोलनाला पाठिंबा म्हणून धामसे गावातील नागरिकांनी वाळपई ते गुळेली रस्ता पूर्णपणे बंद करून ठेवला. रस्त्यावर आडकाठी निर्माण करण्यात आल्यानंतर हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला होता. पोलीस यंत्रणेने सदर रस्ता वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. पोलिसांनी आमच्या भूमिपुत्रांवर अन्याय केलेला आहे. त्यामुळे आमचा पाठिंबा या भूमिपुत्रांना आहे. जोपर्यंत या प्रकल्पासंदर्भात सरकार निर्णायक भूमिका घेत नाही तोपर्यंत या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा राहणार असल्याचे निवेदन या गावातील नागरिकांनी केले. पोलिसानी अनेक स्तरावर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला.
वाळपई पोलिसस्थानकावर मोर्चा
पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले आहेत. यात महिलांचाही मोठय़ा प्रमाणात सहभाग आहे. संतप्त बनलेल्या विरोधकांनी वाळपई शहरामध्ये भव्य मोर्चा काढून पोलीस स्थानकावर ठिय्या मांडला. जवळपास चार वाजता वाळपईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. यामध्ये मोठय़ा प्रमाणात आंदोलक व वेगवेगळय़ा गावातील नागरिक सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांवर जहरी टीका
याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना आंदोलनाचे निमंत्रक शुभम शिवलकर यांनी गोव्यातील कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याचा आरोप केला. ज्यांच्याकडून रक्षणाची अपेक्षा करण्यात येत आहे त्यांच्याकडून अमानुषपणे लाठीचार्ज व महिलांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न हा भाजपा सरकारला शोभत नाही, असे निवेदन करून त्यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर जहरी टीका केली.
मुख्यमंत्र्यांनी थेट चर्चेला येण्याची आंदोलकांची मागणी
आंदोलकांनी पोलीस स्थानकावर जवळपास साडेचार वाजल्यापासून ठिय्या मांडला होता. महिला आंदोलनकर्त्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज केल्याप्रकरणी वाळपईचे पोलीस निरीक्षक सागर एकोसकर यांनी आंदोलनकर्त्यांची जाहीर माफी मागावी. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रत्यक्षपणे चर्चेला यावे, अशा प्रकारच्या दोन मागण्या ठेवून हे आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यावेळी आंदोलनकर्त्या समोर बोलताना विश्वेश परब, गोवा रिव्होल्युशनरीचे प्रमुख मनोज परब यांनी सरकार व पोलिसावर आरोप केला. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी या आंदोलनाच्या मागे मोठे षडयंत्र रचले असून आजचा लाठीचार्ज हा त्यांच्यामुळे झाल्याचा आरोप त्यांनी केला.
धामसे गावातील महिलांवरही लाठीचार्ज
धामसे गावातील काही महिला लाकडांसाठी रानात गेल्या होत्या. याचवेळी पोलिस व आंदोलनकर्त्यामध्ये धुमश्चक्री सुरु झाल्यानंतर पोलिसांनी या महिलांवर अमानुषपणे लाठीचार्ज केल्याचा दावा महिलांनी केला आहे. त्यामुळे सदर गावातील लोक या आंदोलनामध्ये मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते. प्राप्त माहितीनुसार आंदोलनात सहभागी झालेल्या धामसेतील महिला लाठीचार्जमध्ये मोठय़ा प्रमाणात जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सामाजिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहीनी उपचार करून घेण्यास नकार दर्शवून पोलीस स्थानकासमोर झालेल्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. जखमी आंदोलकही मोर्चामध्ये सहभागी झाले होते.