प्रतिनिधी/ वाळपई
मेळावली येथे उभारण्यात येणार असलेल्या आयआयटी विरोधातील आंदोलन शेळ मेळावली नंतर आता सत्तरी तालुक्मयातील वेगवेगळय़ा गावांमध्ये पसरु लागले आहे. धामसे नंतर आता म्हावशी नागरिकांनीही या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा व्यक्त केलेला आहे. म्हावशी ग्रामस्थांची महत्त्वाची बैठक रविवार रात्री उशिरापर्यंत देवस्थानच्या प्रांगणात झाली आणि त्यात आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी पदयात्रेने मेळावलीत जाऊन त्यांनी प्रत्यक्ष समर्थन दिले. खोतोडेवासियांनीही पदयात्रेत सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करुन आंदोलनाच्या विजयापर्यंत एकसंघ राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
रविवारी रात्री ठरल्यानुसार काल सोमवारी सकाळी देवस्थानाच्या प्रांगणामध्ये सार्वजनिक गाऱहाणे घालून पदयात्रा काढीत मोठय़ा प्रमाणात नागरिकांनी शेळ मेळावली येथे जाऊन या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. त्याचप्रमाणे धामसे गावातील नागरिकांनी या आंदोलनाला यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे.
रविवारी रात्री झाली महत्वपूर्ण बैठक
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री म्हाऊस गावातील ग्रामस्थांची महत्त्वाची बैठक देवस्थान प्रांगणात संपन्न झाली. यावेळी भास (भार) उभ्या करण्यात आल्या आणि मानवी स्वरूपात देवाने या आंदोलनाला सर्व नागरिकांनी पाठिंबा द्यावा, अशा प्रकारचे निर्देश दिले. सत्तरी तालुक्मयात आतापर्यंत जी आंदोलन झालेली आहेत त्यांना म्हाऊस नागरिकांनी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. असे असताना या आंदोलनाबाबत ही ग्रामस्थ मंडळी मौनव्रत का बाळगून आहेत, अशा प्रकारचा प्रश्न अवसर रूपात उपस्थित करण्यात आला. तदनंतर या गावातील नागरिकांनी पुन्हा पूर्ण पाठिंबा द्यावा, असा अवसाराने दिला. त्यानंतर ग्रामस्थांनी यासंदर्भात सविस्तरपणे चर्चा केली. सामूहिक गाऱहाणे घालून या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची शपथ घेतली.
सकाळी म्हाऊसमधून सुरु झाली पदयात्रा
सोमवारी सकाळी तिनशेच्या आसपास ग्रामस्थांनी पुन्हा एकदा देवस्थानाला साकडे घालून गावातून पदयात्रा काढीत वाळपई बाजारातून नाणूस, धामसे, आदी गावातून मेळावली गावामध्ये जाऊन मेळावलीवासियांच्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला.
वाळपई पदयात्रा अडविण्याचा पोलिसांचा प्रयत्न
पदयात्रा वाळपई सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या समोर आली असता वाळपई पोलिसांनी अडविली. पोलिसांनी विचारणा केली असता म्हाऊसवासियांनी सांगितले की आमचा पूर्ण पाठिंबा मेळावली भागातील आंदोलनकर्त्यांना आहे. सदर प्रकल्प त्या भागांमध्ये नकोच अशाप्रकारचे संकेत आमच्या देवाने आम्हाला दिलेले आहेत. त्यानुसार आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी जात आहोत. आम्हाला अडविण्याचा प्रयत्न करू नका. तसे केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी यावेळी पोलिसांना दिला.
पदयात्रा अडविण्याचा प्रयत्न निष्फळ
तरीसुद्धा पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला मात्र तो पूर्णपणे अयशस्वी ठरला. या पदयात्रेतील नागरिकांना अडविल्यास पुन्हा एकदा वाळपई भागामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. याचा सारासार विचार करून पोलिसांनी सदर पदयात्रा अडविण्याचा विचार सोडून दिला. पदयात्रा पुढे निघाली.
देवदेवतांच्या जयघोषांनी दणाणाले वाळपई
आयआयटी प्रकल्प रद्द करा, रवळनाथ देवाचा विजय असो, सातेरीमातेचा विजय असो, हर हर महादेव अशा प्रकारच्या घोषणा देत उत्स्फूर्तपणे ही पदयात्रा वाळपईच्या शहरांमधून जात असताना शहर दणाणून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले. ही पदयात्रा पाहून वाळपई शहरातील नागरिक आवाक झाले.
पदयात्रेचे मेळावलीवासियांकडून जोरदार स्वागत
त्यानंतर ही पदयात्रा वाळपई शहराच्या भर बाजारातून सरकारी सामाजिक रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज चौकाला वळसा घालून, नाणूस, सावर्शे, पाडेली, धामसे असे करीत गुळेली भागातील शेळ मेळावली भागामध्ये पोहोचून त्यांनी आपला पूर्ण स्वरूपाचा पाठिंबा व्यक्त केला. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेली ही पदयात्रा दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मेळावलीत पोचली. यावेळी शेळ मेळावली भागातील आंदोलनकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
खोतोडा ग्रामस्थांनीही दिले समर्थन
गुळेली पंचायत क्षेत्राच्या शेजारीच असलेल्या खोतोडा ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांनीही आयआयटी प्रकल्पाला विरोध करून आंदोलनाला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. काल सोमवारी मोठय़ा प्रमाणात खोतोडा भागातील ग्रामस्थ या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी सरकारला 10 दिवसांची मुदत दिली असून कल्पेश गावकर यांना करण्यात आलेली अटक आजच्या दिवसात रद्द करावी व त्यांना आमच्यासमोर हजर करावे, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे.
मेळावासीय आदिवासी, नक्षलवादी नव्हे
मेळावली गावाकडे जाणाऱया सर्व रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करून नाकाबंदी करण्याचा निर्णय खरोखरच निंदनीय असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या भागांमध्ये राहणारी जनता ही बहुजन समाजाची आहे, नक्षलवादी नाहीत. यामुळे सरकारने पोलिसी दहशतीचा वापर करून आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न कदापि सहन होणार नसल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. सत्तरी तालुक्मयातील जनता जागृत होऊ लागलेली आहे. जमीन मालकीचा प्रश्न हा आयटी प्रकल्पाशी निगडित आहे. यामुळे येणाऱया काळात जमीन मालकीच्या प्रश्नासंदर्भात सरकारने जर ही बाब गांभीर्याने घेतली नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावेच लागतील, अशा प्रकारचा इशारा खोतोडा ग्रामस्थानी दिलेला आहे.