राख्या निर्मितीचे काम जोरात : सहाशे झाडांना बांधणार राख्या
वाळपई / प्रतिनिधी
गुळेली पंचायत क्षेत्रातील शेळ मेळावली याठिकाणी होऊ घातलेल्या आयआयटी प्रकल्पाच्या जागेमध्ये मोठय़ा प्रमाणात झाडे आहेत. या झाडांनी आतापर्यंत या गावातील लोकांचे रक्षण व उपजिविकेचे गरज भागविली आहे. यामुळे 5 ऑगस्ट रोजी पंचक्रोशीतील सर्व महिला भगिनी अनोखे रक्षाबंधन करणार असून जी झाडे कापण्यात येणार आहे त्यांना राख्या बांधून आपले नाते निसर्गाची अजूनही अबाधित असल्याचा संदेश देणार आहे.
यासाठी राख्या तयार करण्याचे काम सध्या जोरात सुरू असून जवळपास 600 पेक्षा जास्त राख्या तयार करून त्या झाडांना बांधल्या जाणार आहेत. आयआयटी प्रकल्पासाठी मोठय़ा प्रमाणात झाडे कापण्यात येणार असल्याचे समजते. जी झाडे कापण्यात येणार आहे त्या झाडांवर नंबर घालण्यात आले असून त्या झाडांचे रक्षण व संरक्षण करण्याची जबाबदारी गरज आहे.
आयआयटीमुळे झाडांवर मोठे संकट
गेल्या शेकडो वर्षापासून निसर्ग संपत्तीत महत्त्वाचे योगदान देणाऱया या झाडांनी या गावकरी लोकांचे रक्षण केलेले आहे. त्याच प्रमाणे उपजीविकेचे साधन निर्माण केलेले आहे. आयआयटी प्रकल्पाच्या रुपाने या झाडांवर मोठय़ा प्रमाणात संकट निर्माण झालेले आहे. यामुळे या झाडांचे रक्षण व संरक्षण करणे हे मानवी दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. यामुळे या पंचक्रोशीतील महिलांनी हे महत्व अधोरेखित करण्यासाठी 5 रोजीचा हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
यासंदर्भात महत्वाची बैठक काल सोमवारी मेळावली येथील देवस्थानाच्या प्रांगणात संपन्न झाली. यावेळी मोठय़ा संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या. सर्वांनी झाडांचे रक्षण करण्याची शप्पथ घेतली. त्याचप्रमाणे राख्या बनविण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आलेला आहे.
वनराईच्या रक्षणासाठी रक्षाबंधन : गावकर
यावेळी अंजनी गावकर यांनी सांगितले की या पंचक्रोशीतील सर्व महिलांनी हा निर्धार केलेला आहे. या भागातील वनराई समृद्ध असून यामध्ये शेकडो वर्षाची परंपरा सांगणारी मोठमोठी झाडे आहेत. यामुळे या भागातील जैविक विविधता श्रीमंत असून या झाडांची कत्तल केल्यास गावावर पर्यावरणीय संकट निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱहास थांबविणे व वनराईचे रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून महिला भगिनींनी हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.