प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र कॉलेजमध्ये सादर केल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिबंधक लस घेऊनही त्यांना अद्याप मोबाईलवर मेसेज न आल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग खडतर झाला आहे. यामुळे ‘मेसेज काही येईना, कॉलेजमध्ये प्रवेश मिळेना’ असे म्हणण्याची वेळ कॉलेज विद्यार्थ्यांवर आली आहे.
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू)ने केलेल्या सूचनेनुसार इंजिनिअरिंगच्या दुसऱया व आठव्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना सात जुलैपूर्वी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस सक्तीचा करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी लस घेतली नसेल त्यांना कॉलेजमधून लसीकरण केले जात आहे. आठव्या व दुसऱया सेमीस्टरची परीक्षा जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात होण्याची शक्मयता असल्याने लसीकरण सक्तीचे करण्यात येत आहे.
अनेक विद्यार्थ्यांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन लसीकरण करून घेतले आहे. परंतु त्यातील काही विद्यार्थ्यांना लसीकरण केल्याचा मेसेज आलाच नाही. मेसेजच आला नाही तर ऑनलाईन सर्टीफिकेट कसे काढणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा आहे. कॉलेजने विद्यार्थ्यांना सर्टीफिकेट सादर करण्याचे सांगितले असले तरी मेसेजच न आल्याने प्रवेशाची वाटचाल खडतर झाली आहे.