कोरोनाच्या काळात मागील वषी लोकांचा वेळ जावा म्हणून ‘महाभारत’ ही मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आली. ती पहात असताना माझ्या युवावस्थेतील काही घटना माझ्या स्मरणात आल्या. 1988 ते 1990 या काळात प्रत्येक रविवारी लोकांना टीव्हीला खिळवून ठेवणारी ही मालिका “मै काल हूं….’’ या वाक्मयाने सुरु होत असे.
काळ महत्त्वपूर्ण असल्याचे आपल्याला लहानपणापासून शिकविले जाते. पण हा काळ आहे तरी कोण? घडय़ाळामधील काटे फिरत राहतात याला काळ म्हणायचे काय? काळ एखादी वस्तू आहे का, की ज्याचे मोजमाप केले जाऊ शकते? अनादी काळापासून काळ हा धर्म, तत्त्वज्ञान आणि विज्ञानाच्या संशोधनाचा विषय बनला आहे. परंतु काही मोजक्मया शब्दामध्ये काळाची परिभाषा करणे कठीण आहे. काळ याचा खरा अर्थ काहीही असला तरी तो अत्यंत शक्तिशाली आहे याची जाणीव ठेवून अत्यंत सावधपूर्वक काळाचा उपयोग केला पाहिजे. चाणक्मय पंडित सांगतात ‘आयुष्यातील निघून गेलेला एक क्षण लाखो सुवर्णमुद्रा देऊन देखील परत मिळवता येत नाही, त्यामुळे वेळ व्यर्थ घालवू नका, कारण त्याहून अधिक नुकसान कोणते असू शकते.?’ म्हणजे काळाला धनापेक्षाही जास्त महत्त्व आहे.
आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट काळाद्वारे प्रभावित असते आणि हा काळ आपल्या हातून निसटून जात आहे हे आपल्याला कळतही नाही. आपण सर्वजण स्वतःवर आणि इतरांवर होणारा काळाचा प्रभाव आणि प्रहार पाहू शकतो. आपले शरीर वृद्ध होत चालले आहे. आपल्याला प्रिय असणारे नातेवाईक, मित्र हे जग सोडून गेले आहेत. आपल्या सभोवतालच्या गोष्टीदेखील बदलत चालल्या आहेत, जुनी घरे डळमळीत होऊन जमीनदोस्त होत आहेत आणि नव्या इमारती उभ्या रहात आहेत. व्यापाराच्या पद्धती बदलल्या आहेत. शिक्षणपद्धती बदलल्या आहेत. समाजाची नीतिमूल्ये बदलली आहेत. या यादीला काही अंत नाही.
कालांतराने भगवद गीतेमधील एका श्लोकाने माझ्या मनात घोळत असलेल्या या वाक्मयाचे रहस्य उलगडले. भगवान श्रीकृष्ण सांगतात (गीता 11.32) कालो।़स्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः । ऋते।़पि त्वां न भविष्यन्ति सर्वे ये।़वस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः
अर्थात ‘संपूर्ण जगताचा विनाश करणारा काळ मी आहे आणि येथे समस्त लोकांचा संहार करण्यासाठी मी आलो आहे. तुम्हाला (पांडवांना) सोडून इतर सर्वांचा विनाश निश्चित आहे.’’ या ठिकाणी श्रीकृष्ण आपला भक्त अर्जुनाला एक रहस्योद्घाटन करीत आहेत की ते स्वतः काळ शक्ती आहेत. काळ सर्वश्रे÷ विनाशक शक्ती आहे, कोणीही त्याच्या प्रहारापासून वाचू शकत नाही.
आपण जमा केलेले मित्र, नातेवाईक, प्रति÷ा, धनदौलत सर्व काही मृत्युरूपाने कृष्ण आपल्यापासून हरण करतात. मृत्यू सर्वहारश्चस्मि (गीता 10.34). पण तेच श्रीकृष्ण आपल्याला मृत्यूपासून संरक्षण देऊ शकतात. पण हे संरक्षण शरीराचे नसून ज्या भाग्यवान व्यक्तीने मनुष्य जीवन भगवत भक्तीमध्ये पांडवांसारखे अर्पित केले आहे अशा हरिभक्ती परायण जीवांना! म्हणून श्रीमद भागवतमध्ये चेतावणी दिली आहे. (भा 2.3.17) आयुर्हरति वै पुंसामुद्यन्नस्तं च यन्नसौ । तस्यर्ते यत्क्षणो नीत उत्तमश्लोकवार्तया
अर्थात प्रत्येक सूर्योदय आणि सूर्यास्ताबरोबर आपल्या जीवनातील एक दिवस सूर्य हिरावून नेत आहे. आपल्या प्रकाशाद्वारे प्राणशक्ती देणारा सूर्य एके दिवशी आपले प्राण हिरावून नेतो. परंतु जे लोक सतत भगवान श्रीहरीचे श्रवण कीर्तन करतात, ते याला अपवाद आहेत. काळ प्रत्येक व्यक्तीला नियंत्रित करतो पण नि÷ावान भक्ताला काळाचा प्रभाव आणि प्रकृतीच्या तीन गुणातून मुक्त होण्याचा मार्ग भागवत्कृपेने स्पष्ट दिसू लागतो.
आध्यात्मिक ज्ञानाच्या अभावामुळे व्यक्ती कठोर परिश्रमाद्वारे असीमित भौतिक वस्तूंची निर्मिती अथवा त्यांना एकत्र करतो. तो असा विचार करतो की या वस्तू आपल्याला सुख प्रदान करतील परंतु दुर्भाग्य असे आहे की त्याच्या बुद्धीने निर्माण केलेल्या सर्व वस्तू काळाद्वारे काढून घेतल्या जातात आणि अंततः त्याच्याकडे झालेल्या नुकसानाबाबत शोक करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग शिल्लक राहत नाही.
काळ भगवंताची एक शक्ती आहे आणि त्याचे प्रमुख कार्य आहे समस्त भौतिक वस्तूंचा नाश करणे. भौतिक चेतनेत मग्न झालेले भौतिकवादी लोक आर्थिक प्रगतीच्या नावाखाली अनेकानेक वस्तूंची निर्मिती करण्यात व्यग्र आहेत. त्यांना वाटते की मनुष्याच्या भौतिक गरजा पूर्ण केल्याने ते सुखी होतील. मात्र ते ही वस्तुस्थिती विसरतात की त्यांनी निर्माण केलेल्या सर्व वस्तू काळाच्या प्रभावाने नष्ट होतील. आपण इतिहास उघडून पाहू शकतो की किती लोकांनी प्राण पणाला लावून मोठमोठी साम्राज्ये स्थापन केली, अत्यंत परिश्रम करत त्यांना टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु अंततः काळाने त्यांच्यावर असे आघात केले की आता केवळ काहींचे तुटके फुटके अवशेषदेखील दुर्लभ झाले आहेत. असे लोक जाणत नाहीत की त्याच्या वर्तमान शरीरातील कालावधी अनंत काळामध्ये वीजचमकण्याइतकाच आहे. हे न जाणल्यामुळे ते या क्षणिक जीवनातील सर्व काही मानून आपली आर्थिक स्थिती सुधारण्यामागे जीवन व्यर्थ घालवतात. याच कारणामुळे वृषभदेव आपल्या मुलांना शिकवण देताना श्रीमद भागवतमध्ये सांगतात (भा 5.5.1) नायं देहो देहभाजां नृलोके कष्टान् कामानर्हते विड्भुजां ये । तपो दिव्यं पुत्रका येन सत्त्वं शुद्ध्येद्यस्माद् ब्रह्मसौख्यं त्वनन्तम्
अर्थात ‘या जगातील सर्व देहधारी जीवापैकी ज्यांना मानवी देह लाभला आहे, त्यांनी केवळ इंद्रियसुखाकरिता दिवस रात्र परिश्रम करू नयेत कारण ही इंद्रियसुखे तर वि÷ा खाणाऱया श्वान शुकरांनाही प्राप्त होत असतात. मनुष्याने भक्तिमय सेवेचा दिव्य स्तर प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली पाहिजे. तपश्चर्येमुळे त्यांचे हृदय शुद्ध होते आणि भक्तिमय सेवेचा स्तर प्राप्त होताच त्याला ऐहिक सुखाच्या पलीकडील शाश्वत आनंदमय जीवन प्राप्त होते’. प्रत्येक जीव सुख प्राप्तीसाठीच काबाडकष्ट करीत असतो पण जोपर्यंत तो ऐहिक देहामध्ये बद्ध असतो, तोपर्यंत त्याला काळाच्या प्रभावाने अनेकविध दुःखे भोगावी लागतात. मनुष्य देहामध्ये त्याला भगवंतांनी श्रे÷ बुद्धी प्रदान केली आहे, म्हणून आपण त्यांच्या उपदेशाचे पालन केले पाहिजे आणि काळाच्या प्रभावापासून मुक्त होऊन शाश्वत जीवन प्राप्त करण्याची दुर्मिळ संधी वाया जाऊ देऊ नये.
संत तुकाराम महाराजही एका अभंगात या काळाची महती सांगताना वर्णन करतात काळाचीये सत्ता ते नाही घटिका। पंढरीनायका आठविता ।।1।। सदा काळ गणना करी आयुष्याची । कथेचे वेळेची आज्ञा नाही ।।2।। याकारणे माझ्या विठोबाची कीर्ती । आहे हे त्रिजगती थोर चाड ।।3।। तुका म्हणे जन्मा आलियाचे फळ स्मरावा गोपाळ तेचि खरे ।।4।।
अर्थात ज्या ज्यावेळी पांडुरंगाचे चिंतन होते त्या त्या वेळी काळ त्याची गणना करीत नाही. काळही आयुष्याची सर्व काळ गणना करतो पण हरिकथेच्या वेळेची गणना त्याला करण्याची आज्ञा नाही. त्यामुळे माझ्या विठोबाची कीर्ती त्रैलोक्मयात फार मोठी आहे. गोपाळांचे स्मरण कीर्तन भजन करणे यातच मनुष्यजन्माला आल्याची सार्थकता आहे. म्हणून काळ आपणास नष्ट करेल त्याआधी काळाला समजण्यासाठी वेळ काढा आणि भागवतसेवेसाठी त्याचा सदुपयोग करावा.
वृंदावनदास