ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत-चीनमध्ये सीमावादावरून निर्माण झालेला तणाव कमी करण्यावर रशियातील मॉस्कोमध्ये परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात चर्चा झाली. 10 सप्टेंबरला ही बैठक झाली. या बैठकीपूर्वी दोन दिवस दोन्ही देशातील सैनिकांमध्ये पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळ गोळीबाराची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
पूर्व लडाखमधील फिंगर 3 आणि फिंगर 4 क्षेत्रात रेजलाईनवर 8 सप्टेंबरला दोन्ही सैन्यांकडून 100 ते 200 राउंड फायर झाले. हा गोळीबार सैन्याने एकमेकांवर न करता हवेत केला. या फायरिंगसाठी एलएमजी आणि असॉल्ट रायफलींचा वापर झाल्याचे सांगण्यात येत आहे.
चिनी सैनिकांना रोखण्यासाठी 7 सप्टेंबरलाही शेनपॉव डोंगर रांगात भारतीय सैन्याला हवेत गोळीबार करावा लागला होता. चिनी सैन्याचे घुसखोरचे सर्व डाव भारतीय सैन्याने उलथून लावले आहेत.