शहरात ठिकठिकाणी बॅरिकेट्स, पोवई नाक्यावर वाहतूक शाखेचा बंदोबस्त
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनामुळे शहरात सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे बाहेर फिरणे सुद्धा टाळले पाहिजे. त्याकरता पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी कळके लावून रस्ते अडवले आहेत. रस्ते बंद केले आहेत. असे असले तरीही विनाकारण कारणासाठी शहरातील रस्त्यावर येणाऱयांची संख्या मोठी आहे. पोवई नाका येथे वाहतूक शाखेच्यावतीने दुचाकी आणि चार चाकी वाहनांची केली जात होती. तर राजवाडय़ावर पोलिसांच्याऐवजी मोकाट जनावरांनीच रस्ता अडवून ठेवत विनाकारण फिरणाऱयांना काही काळ जावू दिले नाही.
जिह्याबरोबरच सातारा शहरात लॉक डाऊन आहे. परंतु तो पाळणारे कुठे दिसत नाहीत. सदरबझारमध्ये तर कॅनॉललगत असलेल्या धार्मिकस्थळाच्या परिसरात काही लोक सकाळी मासे पकडत होते. अस्वच्छ पाण्यात गळ टाकून दहा ते पंधरा जण मासे पकडत होते. हे मात्र, कोणत्याही कोरोना विरोधी गस्ती पथकाला दिसले नाही. शहरात चौकाचौकात रस्ते कळकांच्या सहाय्याने बंद केले आहेत. तरीही त्यातूनच आपली दुचाकी रेमटत सातारकर इच्छीत स्थळी पोहचत आहेत. राजवाडा येथे चाँदणी चौकात काही फळ विक्रेत्याचे गाडे लावलेले आहेत. त्यांच्या तोंडावर मास्कही दिसत नव्हते. शहरात रस्त्यावर किरकोळ स्वरुपात वर्दळ दिसत असली तरीही काही ठिकाणी व्यापाऱयांनी आपली दुकाने सुरु ठेवली होती. त्यांच्या दुकानापुढे सोशल डिस्टन्स पाळला जात नव्हता. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार हे मात्र पोवई नाक्यावर दुचाकी वाहने, चार चाकी वाहने तपासत होते. काही वाहनधारकांशी वादावादी होत होती. दरम्यान, विठ्ठल गवई मंदिरासमोर आठ ते दहा मोकाट गाई फिरत फिरत आल्या. त्यांनी सर्व रस्ताच बंद करुन बाहेर फिरायचे नाही. घरात बसायचे असेच जणू सातारकरांना सांगितले.