कसबा बीड / प्रतिनिधी
हिरवडे दुमाला तालुका करवीर येथील निवास श्रीपती यादव व रघुनाथ धोंडीराम यादव हे दोघेजण राजाराम सहकारी साखर कारखाना कसबा बावडा येथे येत असताना कसबा बीड पुलावरून पुढे आल्यानंतर काही अंतरावर म्हैस आडवी आल्याने दोघेही गाडीवरून पडले. तेव्हा रघुनाथ यादव यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यांना उपचारासाठी सिटी हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मयत रघुनाथ यादव हे शेती काम करत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई,दोन भाऊ व पुतण्या असा परिवार आहे. घरातील कर्ता गेल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. सदर अपघाताची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली असून ठाणे अमलदार राजाराम बर्गे व देसाई पुढील तपास करत आहेत.