ऑनलाईन टीम/तरुण भारत
गेल्या काही दिवसांत अनेक देशांमध्ये कोरोनाचे अनेक नवीन प्रकार आढळून आले आहेत. काही ठिकाणी साथीच्या संभाव्य चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आत महाराष्ट्र सरकारनेही संपूर्ण निर्बंध हटविले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्यात आला आहे. तसेच मास्कमुक्त राज्य घोषित केले आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
टोपे म्हणाले, १ एप्रिलपासून महाराष्ट्रातील सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना वाटत असेल मास्क लावावा, त्यांनी तो लावावा. ज्यांना वाटत असेल मास्क लावू नये, त्यांनी लावू नये. आता कोणतंही बंधन राज्यात राहिलेलं नाही”, त्यामुळे आता गुढी पाडवा, रमजान, राम नवमी असे सण साजरे करण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, सार्वजनिक आरोग्य मंत्री टोपे यांनी महाराष्ट्र मास्कमुक्त पण ऐच्छिक असेल असे जाहीर केले. टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे सांगितले. राज्यात मास्कचा वापरआता ऐच्छिक असेल असे टोपे यांनी सांगितले आहे. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात मास्क सक्ती नसेल पण ज्यांना मास्क वापरायचा आहे ते मास्क वापरू शकता.
यापुढे राज्यात कोणतेही निर्बंध असणार नाहीत. संपूर्ण निर्बंध हटविले आहेत. मास्क ज्यांना वापरायचा आहे ते वापरू शकतात. जिम, हॉटेल, मॉल्स आणि अन्य ठिकाणी नागरिकांच्या संख्येची मर्यादा असणार नाही असे त्यांनी जाहीर केले आहे.