नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
कॉंग्रेस नेते राहुल गांधी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील कोरोना स्थितीवरून वारंवार मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. आज देखील राहुल गांधी यांनी एक ट्वीट करत लसीकरणावरून पुन्हा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खोटी प्रतिमा वाचविण्यासाठी केंद्र सरकार सतत व्हायरसचा आधार घेत आहे आणि जनतेचा जीव घेत आहे. देशातील लसीकरण लवकर पुर्ण करावे लागेल. मोदी सरकारच्या असक्रियतेमुळे लसीची कमतरता लपविण्यासाठी भाजपने रोज खोटं बोलणं आणि पोकळ आश्वासन देण्याने काही होणार नाही. देशाला त्वरित आणि संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्याप्रमाणेच प्रियांका गांधी देखील देशातील कोरोन स्थिती, लसीकरण यावरून वारंवार मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. सध्या देशात लसीकरणाची मोहीम सुरू आहे. यावरूनच राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.