ऑनलाईन टीम/तरुण भारत
भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाची कथितरीत्या २२ हजार ८४२ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याबद्दल केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एबीजी शिपयार्ड लि. आणि तिचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध काल(शनिवार) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावरून मोदी सरकारवर काँग्रेसकडून टीका केली जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक झालेली आहे. ७५ वर्षांमध्ये भारतातील जनतेच्या पैशाची एवढी फसवणूक झालेली नाही. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदी मित्रांसाठी ‘अच्छे दिन’ आहेत.” असं राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.