ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
कोरोना संसर्गाच्या लाटेने देशातील अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. यातच कमी जास्त प्रमाणात वैद्यकिय सेवांचा अभाव, वेळेत न होणारे उपचार, या सारख्या अनेक कारणांनी देशातील सामान्य नागरिकांना कोरोना पासून बचावासाठी धडपड करावी लागली. या स्थितीची नोंद घेत देश – विदेशातून टीका झाली. या केंद्राच्या नियोजनावर विरोधी पक्ष ही वारंवार बोट ठेवत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचे अश्रू कोरोना मृतांचे जीव वाचवू शकत नाहीत अशी खरमरीत टीका केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, काहींना ऑक्सिजन मिळाला नाही. पंतप्रधान मोदींचे अश्रू या कोरोनाने जीव गमावलेल्या कुटुंबाचे अश्रू पुसू शकत नाही. तसेच मोंदींचे अश्रू त्यांचा जीव वाचवू शकत नाही, ऑक्सिजन वाचवू शकतो. पण नेमके याच वेळी पंतप्रधानांचे सारे लक्ष यावेळी बंगालच्या निवडणुकीवर होतं.
वाराणसी येथे आरोग्य कर्मचाऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधला होता. यावेळी करोनामुळे निधन झालेल्यांबद्दल बोलताना नरेंद्र मोदी भावूक झाले होते. याच पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांनी हा निशाना साधला आहे.