प्रतिनिधी / कोल्हापूर
देशात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले आहे. कोविडपूर्वी तिमाही अर्थिक विकास दर 4.2 टक्के होता. या दरात आता मोठÎा प्रमाणात घसरण झाली आहे. केवळ पेट्रोल, डिझेलचे दर वाढवून, त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या खिशातून पैसे काढून घेऊन देशात विकासकामांसह जनहिताच्या योजना आणि शासकीय कर्मचाऱयांचे पगार दिले जात आहेत. हंगर (उपासमारी) इंडेक्समध्ये 116 देशांच्या यादीमध्ये भारत 101 व्या क्रमांकावर असून बालकांच्या कुपोषणामध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत केला.
चव्हाण म्हणाले, केंद्र सरकारने कृषी कायद्यात बदल करून शेतकऱयांवर अन्याय केला आहे. लखीमपूर येथील आंदोलनातील शेतकऱयांना चिरडण्याचा प्रयत्न केला. घमेंडखोर केंद्रीय मंत्र्यांनी उन्माद मांडला आहे. 24 ऑगस्टला जनुकीय बदल पेलेल्या सोयाबिनची 12 लाख टन पेंड आयात केली आहे. त्यामुळे सोयबिनच्या दरात मोठी घसरण झाली असून त्याचा शेतकऱयांना फटक बसला आहे. खाद्य तेलाला आयात कर लागू केल्यामुळे त्याच्या दरात वाढ झाली आहे. केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी केले पाहीजे. तरच महागाई कमी होणार आहे.
तपास यंत्रणेचा दहशतीसाठी वापर
केंद्र सरकारकडून तपास यंत्रणेचा दहशतीसाठी वापर केला जात आहे. धाडी टाकायच्या. वातावरण निर्मिती करायची हेच मोदी सरकारचे प्रमुख धोरण आहे. आजतागायत अनेक राजकीय नेत्यांवर धाडी टाकल्या. पण अद्याप एकही नेता दोषी आढळलेला नाही. दोषी असेल तर न्यायालयात सिद्ध होणारच. पण केवळ भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठीच ही सर्व खेळी केली जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
सतेज पाटील यांना उज्वल भवितव्य
पालकमंत्री सतेज पाटील यांना कॅबिनेट मंत्री पद मिळायला हवे होते काय ? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर चव्हाण म्हणाले, सतेज पाटील हे एक उगवते नेतृत्व असून त्यांना उज्वल भवितव्य आहे. मी स्वत: मुख्यमंत्री असतो तर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्याचा नक्की विचार केला असता, अशी स्पष्टोक्ती चव्हाण यांनी केली.