ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बुध्दीबळाचा बादशहा विश्वनाथ आनंद यांना मोदी सरकारद्वारे स्थापन केलेल्या अखिल भारतीय क्रीडा परिषदेतून (एआयसीएस) बाहेर काढण्यात आले आहे. समतिच्या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.
देशातील खेळांच्या विकासाशी संबंधित मुद्यांचे निराकरण करण्यासाठी या परिषदेची स्थापना करण्यात आली होती. मोदी सरकारने डिसेंबर 2015 मध्ये या परिषदेची स्थापना केली होती. तत्कालीन क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या परिषदेची स्थापना केली होती. या परिषदेच्या पहिल्या कार्यकाळात सचिन तेंडुलकरचा राज्यसभेचे खासदार आणि विश्वनाथ आनंद याचा खेळाडू म्हणून सहभाग करण्यात आला होता.
दरम्यान, दुसऱया कार्यकाळात या परिषदेची सदस्य संख्या कमी करण्यात आली. परिषदेतील सदस्य संख्या 27 ऐवजी 18 करण्यात आली. सचिन तेंडुलकर याच्यासह बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतिया याला देखील बाहेर काढण्यात आले आहे.
सचिन तेंडुलकर आणि विश्वनाथ आनंद यांच्या जागी आता क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि कृष्णामाचारी श्रीकांत यांचा समावेश करण्यात आला आहे.