ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना संकटात दाखल झालेल्या याचिकांवर अनेकविध न्यायालयांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले होते. मात्र, कोरोना मृतांच्या नातेवाईकांना सानुग्रह मदत देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची दखल घेत सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारचे कौतुक केले आहे. मोदी सरकारने जे कार्य केले ते इतर कोणत्याही देशाला जमले नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
कोरोनामुळे देशात लाखो लोक दगावले. अनेकांचे संसार उघडय़ावर पडले. त्यामुळे मोदी सरकारने मृतांच्या कुटुंबियांना सानुग्रह मदत जाहीर केली आहे. या मदतीमुळे गरीब कुटुंबांना सावरण्यासाठी मदत होणार आहे. हे काम आतापर्यंत कोणत्याही देशाला जमले नाही. त्यामुळे मोदी सरकारच्या या निर्णयाची न्यायिक नेंद घेणे गरजेचे आहे, असे सुप्रीम केर्टाने म्हटले आहे.