महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस स्नेहल डोके यांचा आरोप
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना काळात देशातील जनतेचे खूप हाल झाले. देशातील मृतांचा आकडा मोदी सरकारने लपवला आहे. मोदी सरकारच्या बेपर्वाईमुळे 47 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे देशातील लोकांना वाचवू शकले नाही, असा आरोप काँग्रेसच्या युवक आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल डोके यांनी केला. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
साताऱयात काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी काँग्रेसचे जिह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. त्या म्हणाल्या, आमचे नेते खासदार राहुल गांधी म्हणालेत की देशाचे पंतप्रधान मोदी स्वतः सत्य सांगत नाहीत. दुसऱयांनाही सांगू देत नाहीत. कोव्हिड महामारीत ऑक्सिजन अभावी कोणाचा मृत्यू झाला नसल्याचे ते आर्वजून सांगत आहेत. मात्र, देशातील सरकारच्या बेपर्वाईमुळे 5 लाखाहून अधिक नागरीक तर 47 लाख नागरीक मरण पावले आहेत. आणि मृताची जबाबदारी मोदींनी घेवून प्रत्येक पिडीत कुटुंबाला 4 लाख सरकारने मदत दिली पाहिजे. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे देशातील लोकांना हे सरकार वाचवू शकले नाही. 47 लाख लोकांना मृत्यूच्या दारात ढकलून नरेंद्र मोदींना विश्वगुरु बनवायचे आहे काय?, डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार कोरोना काळात जगात सर्वात जास्त मृत्यू भारतात झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.