ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
देशात दिवसेंदिवस महागाईने सामान्याचे कंबरडे मोडले असुन प्रत्येक दिवशी वाढत जाणारे पेट्रोल – डीझेलचे दर यामुळे याचा परिणाम दैनंदिन गरजेच्या वस्तुंच्या किंमती ही गगनाला भिडल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्रावर जहरी टीका केली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्रावर टीका करताना भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ ‘आझादी का अमृत महोत्सव’ पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमतीत विक्रमी वाढ केल्याबद्दल स्मरणात राहील. नरेंद्र मोदी सरकारने जनतेला दिवाळी भेट म्हणून महागाई दिल्याचे दिसते, असेही ते म्हणाले.
पेट्रोल, डिझेल, एलपीजी, खाद्यतेल आणि भाज्यांच्या किमती वाढतच आहेत, ते पाहता मोदी सरकारने भेट म्हणुन महागाईची दिवाळी भेट दिली आहे, असे गेहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ते म्हणाले, “आधीची सरकारे सणांच्या आधी महागाई कमी करण्याचा प्रयत्न करत असत, जेणेकरून सर्वसामान्यांना सण आनंदाने साजरा करता यावा.” केंद्र सरकारने पेट्रोलचे दर प्रतिलिटर ११६ रुपये आणि डिझेलचे दर प्रतिलिटर १०८ रुपये केले आहेत. तर घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचे दर एका वर्षात ५९८ रुपयांवरून ९०३ रुपयांपर्यंत ३०५ रुपयांनी वाढले आहेत.