ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
पेगॅसस प्रकरणावरुन देशात भाजप सरकारवर विरोधी पक्षांनी प्रश्नांची सरबती उठवली आहे. केंद्र सरकारला घेराव घालण्यासाठी बैठक घेत केंद्राला चांगलेच धारेवर धरले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपला सवाल करत पेगॅसस विकत घेतलं की नाही ? असे विचारले आहे. यावेळी विरोधकांनी सरकारवर हेरगिरीचा आरोप ही केला आहे.
संसदेच्या लोकसभा व राज्यसभेत अधिवेशनाचा आठव्या दिवशीही विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घालत पावसाळी संसद कामकाजात अडथळा निर्माण केला. यामध्ये काँग्रेससह १४ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारला घेरण्याची व दबाव निर्माण करण्याची रणनिती आखली आहे.
राहूल गांधी यांनी “देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आहेत. आमचा आवाज संसदेत दाबला जात आहे. सरकारने पेगॅसस विकत घेतलं की नाही ?, हा आमचा प्रश्न आहे. सरकारने आपल्या लोकांविरोधात पेगॅससचा वापर केला की नाही ? हा सुद्धा प्रश्न आहे. आम्हाला फक्त हे जाणून घ्यायचं आहे. पेगॅससवर संसदेत कोणतीही चर्चा होणार नाही, असं सरकारनं आम्हाला स्पष्ट सांगितलं आहे.”, असा आरोप केला.
राहूल गांधी यांनी देशातील तरुणांना केला सवाल
मी देशातील तरुणांना विचारू इच्छितो की, तुमच्या फोनमध्ये नरेंद्र मोदी यांनी हत्यार टाकलं आहे. माझ्या विरोधात त्याचा वापर केला गेला. सुप्रीम कोर्टाविरोधात या हत्याराचा वापर केला गेला. बाकी नेत्यांच्या विरोधात याचा वापर केला. याचं उत्तर सरकारने दिलं पाहीजे,” असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.