पेडणे ( प्रतिनिधी )
अन्याय आणि अत्याचार विरोधात परत एकदा मोपा विमानतळ पिडीत शेतकऱयांच्या हितासाठी आणि स्थानिकांनाच रोजगार मिळवून देण्यासाठी क्रांती करावी लागणार आहे . त्यासाठी कोणत्याही स्तरावरा जाण्याची आमची तयारी आहे . खोटय़ा तक्रारी दाखल करुध आम्हाला अटक करून आमचा आवाज दडपण्याचा जर राज्यकर्त्यांनी प्रयत्न केला तर तो यशस्वी व्हायला देणार नाही . आता वेळ जवळ आली ती बाबू आजगावकर याना परत गांधी मार्केट मध्ये पोचवण्याची . आम्हाला अटक केली म्हणून आमचा आवाज बंद झाला नाही उलट आगीची ज्वाला तेजाने भडकणार आहे .असा इशारा मोपा उपसरपंच सुबोध महाले , सिद्धेश महाले व उमेश वरक या तिघाना पेडणे दिला. ड़ पेडणे पोलिसांनी 21 रोजी मेघा व्हाइड मोपा विमानतळ प्रकल्पाच्या बांधकाम कंपनीने तिघांच्या विरोधात तक्रार दिली होती त्याच दिवशी त्यांना अटक केली होती. राञी उशिरा त्यांची जामिनावर सुटका झाल्यावर आंदोलन कर्त्यांनी पेडणे पोलीस स्टेशन परिसरात गर्दी केली होती .यावेळी मोठय़ा प्रमाणात जल्लोष केला . त्या वेळी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना आंदोलन कर्त्यांनी वरील प्रमाणे इशारा दिला .
यावेळी उद्योजक जीत आरोलकर , प्रवीण आर्लेकर , पंच मधुसूदन देसाई , माजी सरपंच चंद्रशेखर खडपकर , काँग्रेस प्रवक्ते विठू मोरजकर , माजी सरपंच दशरथ महाले , वकील मुरारी परब , सुनील शेटय़? ,पेडणे तालुका समितीचे सल्लागार प्रसाद शहापूरकर , वकील जितेंद्र गावकर , माजी सरपंच किशोर नाईक , पंच राकेश स्वार ,व्यंकटेश नाईक , राजमोहन शेटय़? , गोंयचो आवाज संघटनेचे सुर्यकांत चोडणकर आदींनी आंदोलनकर्त्याना पाठींबा देवून मोपा विमानतळ वरदान ठरत नसेल तर तो शाप ठरवला जात असेल तर आता नव्याने क्रांती करण्यासाठी संघटीत होवून लढा उभारण्यासाठी निर्धार केला .
मोपा विमानतळासाठी ज्या पाच गावाच्या जमिनी जातात त्या पाच गावातील युवकांनी एकत्रित येवून मोपा विमानतळ संघर्ष समितीची स्थापना करून चळवळ सुरु केली , स्थानिकाना वगळून विमानतळावर बाहेरच्याना नोकऱया लहान मोठी कामे दिली जातात , मात्र ज्यांच्या जमिनी गेल्या त्याना मोबदला नाहीच शिवाय नोकरी , छोटे मोठे काम धंदेही देण्याऐवजी परस्पर दिले जातात त्यासाठी स्थानिकाना रोजगार काम धंदा विमानतळ प्रकल्पावर मिळावा यासाठी समितीतर्फे चळवळ सुरु केली . या चळवळीचे प्रमुख सुबोध महाले ,सिद्धेश महाले आणि उमेश वरक या तिघानाही कंपनीने दिलेल्या तक्रारीमुळे अटक केली .
दरम्यान आंदोलन कर्त्यांनी 19 रोजी सिदेश महाले याना कंपनीच्या अधिकाऱयांनी मारहाण केल्याची लेखी तक्रार पेडणे पोलिसाना दिली . त्याच्यावर अजूनपर्यंत काहीच कारवाई झाली नाही उलट कंपनीने 20 रोजी सायंकाळी साडेचार वाजता तक्रार दिल्यावर आंदोलन कार्त्याना 21 रोजी दुपारी एक वाजता अटक करून एकावर अन्याय दुसऱयाला न्याय अशी भूमिका घेतली .
पोलीस निरीक्षक जिवबा दळवी याचे शब्द हवेतच विरले ?
पेडणे तालुका नागरिक समित्तीच्या शि÷मंडळाने मागच्या आठवडय़ात पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांची भेट घेवून 11 कलमी निवेदन सादर केले होते , त्यावेळी दळवी यांनी समितीला शब्द देताना आपण कुणावरही अन्याय करणार नाही सर्व तक्रारीवर योग्य तो न्याय देणार असल्याचा दिला होता , तर मग अगोदर तक्रार देणाऱया तक्रारदारांच अटक करून न्याय दिला कि अन्याय दिला हे आता त्यांनी संशोधन करून पाहावे असे मत समितीच्या पदाधिकाऱयानि व्यक्त केले . सुबोध महाले आंदोलनकर्ते सुबोध महाले यांनी बोलताना मोपा विमानतळ जमिनीसाठी 2008 साली जमीन संपादन प्रक्रिया सुरु झाली , मोपा विमानतळ व्हावा यासाठी प्रत्येक पेडणेकरांची इच्छा होती . हा प्रकल्प आम्ही मागून घेतला , या प्रकल्पामुळे तालुक्मयाचा चेहरा मोहरा बदलून जाणार होता तत्पूर्वी 20014 ची जमीन प्रक्रिया घाई गडबडीत उकरून घेतली आणि जमिन्दाराना 30 रुपया प्रमाणे भाव दिला . तोच भाव तीन हजार रुपये प्रमाणे द्यावा लागला असता . त्यासाठी आमचा संघर्ष समिती मार्फत आंदोलन लढा चालू आहे , नोकरी आणि योग्य तो मोबदला मिळावा म्हणून पिडीत शेतकरी रस्त्यावर येतात तर खोटय़ा तक्रारीची दाखल घेवून पोलीस अन्याय करतात असा दावा करून आम्ही मुक्त गोव्यात आहोत कि काय असा सवाल उपस्थित करून आता पेज्ञातून परत क्रांती करून हि मशाल आता पूर्ण गोव्यात पेटणार असा इशारा दिला