गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मोफत आणि खुल्या इंटरनेटवर हल्ले वाढत असल्याने भविष्यामध्ये सुरक्षेबाबत चिंता निर्माण होण्याची शक्यता असल्याचे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांनी एका न्यूज चॅनेलवर बोलताना म्हटले आहे. विविध देशांमध्ये माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आणले जात आहेत.
इंटरनेटचे भविष्य हे कोणत्याही देशाच्या सरकारसाठी किंवा एखाद्या व्यक्तिसाठी मर्यादीत स्वरूपात राहू नये, असे मत पिचाई यांनी व्यक्त करत याबाबतची जबाबदारी सामूहिक तत्वावर घेतली जायला हवी. आजघडीला वापरकर्त्यांनी आपल्या फोनवर ऑपरेटिंग सिस्टम नेहमी अपडेट करत राहणे आवश्यक आहे. यात आपल्याला नव्या सुविधांचा लाभ तर मिळतोच पण दुसरीकडे सुरक्षाही राखली जाते. मोबाइलमधील ऑपरेटिंग सिस्टम अपडेट केल्याने फोनमधील व्हायरसही काढला जातो, असेही त्यांनी सांगितले.